शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

नितीश कुमार अन् चिराग यांनी वक्फ विधेयकावरील सस्पेन्स वाढवला, विरोधकांची चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:08 IST

दोन्ही पक्षांनी विधेयकाबाबत त्यांचे कार्ड उघड केलेले नाहीत, परंतु संकेत देऊन विरोधकांचा ताण वाढवला आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाऊ शकते. त्याआधी, सरकार आणि विरोधी पक्ष आपापली फिल्डिंग लावत आहेत. विरोधकांनीही मोठी तयारी सुरू केली आहे. विधेयक थांबवण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी विधेयक पास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, एनडीएमधील भाजपचे मित्रपक्ष जेडीयू आणि चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपी-आर यांनी सस्पेन्स वाढवला आहे. 

दोन्ही पक्षांनी विधेयकाबाबत त्यांचे कार्ड उघड केलेले नाहीत, पण संकेत देऊन विरोधकांचा ताण वाढवला आहे. चिराग आणि नितीश यांच्या पक्षाने म्हटले की, विरोधी पक्ष मुस्लिमांची दिशाभूल करत आहे. लोकांनी असे घाबरू नये. जेडीयूचे एमएलसी गुलाम गौस यांनी या विधेयकाला उघडपणे विरोध केला आहे आणि मोदी सरकारला ते मागे घेण्याचे आवाहन केले आहे. 

"उत्तराखंडचं नावही उत्तर प्रदेश-2 करून टाका"; अखिलेश यादव CM धामींवर इतके का भडकले?

गुलाम गौस म्हणाले की, माझ्या मते हे विधेयक ताबडतोब मागे घेतले पाहिजे. शेतकरी आंदोलन झाले तेव्हा अनेक लोक मारले गेले आणि शेवटी देशाच्या हितासाठी हे विधेयक मागे घेण्यात आले. आता जेव्हा शेतकरी विधेयक मागे घेता येते तेव्हा वक्फ विधेयक का मागे घेता येत नाही? गुलाम गौस म्हणाले की, माझा पक्ष पाठिंबा देत आहे असा दावा करता येणार नाही. आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काहीही सांगितले नाही. सध्या तरी ते मागे घ्यावे असे माझे वैयक्तिक मत आहे, असंही ते म्हणाले.

लल्लन सिंह यांनी यावर काहीही सांगितले नाही. ते म्हणाले की, आम्ही लोकसभेतच या विधेयकावर आमची भूमिका स्पष्ट करू. आम्हाला विरोधी पक्षाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. नितीश कुमार यांना काँग्रेसकडून प्रमाणपत्राची गरज नाही. त्यांनी स्वतःच्या आत डोकावून पाहिले पाहिजे की त्यांनी इतकी वर्षे राज्य केले, पण त्यांनी मुस्लिमांसाठी काय केले?, असा सवालही त्यांनी केला. मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी नितीश कुमार यांनी जे काम केले आहे ते देशातील कोणत्याही सरकारने केलेले नाही, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा