शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नितीश कुमार अन् चिराग यांनी वक्फ विधेयकावरील सस्पेन्स वाढवला, विरोधकांची चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:08 IST

दोन्ही पक्षांनी विधेयकाबाबत त्यांचे कार्ड उघड केलेले नाहीत, परंतु संकेत देऊन विरोधकांचा ताण वाढवला आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाऊ शकते. त्याआधी, सरकार आणि विरोधी पक्ष आपापली फिल्डिंग लावत आहेत. विरोधकांनीही मोठी तयारी सुरू केली आहे. विधेयक थांबवण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी विधेयक पास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, एनडीएमधील भाजपचे मित्रपक्ष जेडीयू आणि चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपी-आर यांनी सस्पेन्स वाढवला आहे. 

दोन्ही पक्षांनी विधेयकाबाबत त्यांचे कार्ड उघड केलेले नाहीत, पण संकेत देऊन विरोधकांचा ताण वाढवला आहे. चिराग आणि नितीश यांच्या पक्षाने म्हटले की, विरोधी पक्ष मुस्लिमांची दिशाभूल करत आहे. लोकांनी असे घाबरू नये. जेडीयूचे एमएलसी गुलाम गौस यांनी या विधेयकाला उघडपणे विरोध केला आहे आणि मोदी सरकारला ते मागे घेण्याचे आवाहन केले आहे. 

"उत्तराखंडचं नावही उत्तर प्रदेश-2 करून टाका"; अखिलेश यादव CM धामींवर इतके का भडकले?

गुलाम गौस म्हणाले की, माझ्या मते हे विधेयक ताबडतोब मागे घेतले पाहिजे. शेतकरी आंदोलन झाले तेव्हा अनेक लोक मारले गेले आणि शेवटी देशाच्या हितासाठी हे विधेयक मागे घेण्यात आले. आता जेव्हा शेतकरी विधेयक मागे घेता येते तेव्हा वक्फ विधेयक का मागे घेता येत नाही? गुलाम गौस म्हणाले की, माझा पक्ष पाठिंबा देत आहे असा दावा करता येणार नाही. आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काहीही सांगितले नाही. सध्या तरी ते मागे घ्यावे असे माझे वैयक्तिक मत आहे, असंही ते म्हणाले.

लल्लन सिंह यांनी यावर काहीही सांगितले नाही. ते म्हणाले की, आम्ही लोकसभेतच या विधेयकावर आमची भूमिका स्पष्ट करू. आम्हाला विरोधी पक्षाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. नितीश कुमार यांना काँग्रेसकडून प्रमाणपत्राची गरज नाही. त्यांनी स्वतःच्या आत डोकावून पाहिले पाहिजे की त्यांनी इतकी वर्षे राज्य केले, पण त्यांनी मुस्लिमांसाठी काय केले?, असा सवालही त्यांनी केला. मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी नितीश कुमार यांनी जे काम केले आहे ते देशातील कोणत्याही सरकारने केलेले नाही, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा