शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मंत्रिमंडळातील 75 टक्के भ्रष्ट मंत्र्यांबाबत नितीश गप्प का? - तेजस्वी यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 22:05 IST

महाआघाडी मोडणाऱ्या नितीश कुमार यांच्याविरोधात राष्ट्रीय जनता दलाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. काल लालू प्रसाद यादव यांनी नितीश यांची पलटूराम अशी हेटाळणी केल्यानंतर आज तेजस्वी यादव यांनी हल्लाबोल केला आहे.

पाटणा, दि. 2 - महाआघाडी मोडणाऱ्या नितीश कुमार यांच्याविरोधात राष्ट्रीय जनता दलाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. काल लालू प्रसाद यादव यांनी नितीश यांची पलटूराम अशी हेटाळणी केल्यानंतर आज तेजस्वी यादव यांनी हल्लाबोल केला आहे. नितीश यांच्या मंत्रिमंडळातील 75 टक्के मंत्री भ्रष्ट असून, त्यांच्याबाबत नितीश यांनी मौन का पाळले आहे, असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला आहे. या मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांची नावे पनामा पेपर्समध्ये आहेत. आम्ही त्यांच्या चौकशीची मागणी करणार आहोत, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करताना तेजस्वी यादव म्हणाले, "नितीश कुमार यांचा अंतरात्मा नाही तर खुर्ची आत्मा बोलतो. त्यांनी महाआघाडी तोडून जी चूक केली आहे. त्यासाठी त्यांना नेहमीच टीका ऐकावी लागेल. सामाजिक न्यायाला मानणाऱ्या लोकांना  तुम्ही काय उत्तर देणार आहात. ही मंडळी आयुष्यभर तुम्हाला विचारत राहणार. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील.  मुख्यमंत्री काहीतरी बोलतील असे वाटले होते. पण मी बोलत असताना यांनी थेट प्रक्षेपणच बंद केले. आम्ही सांगितले होते की आम्ही जनतेमध्ये जाऊन सवाल विचारू, पण सभागृहात बोलत असताना माझा आवाज का बंद करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना याचे उत्तर द्यावे लागेल." यावेळी  लालूप्रसाद यांचा जातीचे राजकारण करणारे नेते अशा नितीश यांनी केलेल्या उल्लेखालाही तेजस्वी यांनी प्रत्युत्तर दिले.  तेजस्वी म्हणाले, "लालूजी आणि आरजेडीचे कार्यकर्ते जातीचे राजकारण करतात असे म्हणाले. तर स्वत:ला त्यांनी जननेते म्हणवले. पण मंडल आयोगाचे वारे वाहू लागल्यावर नितीश कुमार यांनी जनतेला धोका देऊन समता पार्टीची स्थापना केली आणि कमंडल हातात घेतले.  तेव्हा जनता तर लालूंच्या सोबत होती. "