शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

टोल नाक्यांवरून सुटा सुस्साट; टोलचे पैसे बँक खात्यातून होणार वळते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 11:36 IST

वाहतूक कोंडी फुटणार; टोल नाके स्मार्ट होणार

नवी दिल्ली: लवकरच टोलनाक्यांवर गाड्यांना थांबावं लागणार नाही. कारण गाड्यांनी टोलनाका ओलांडताच कार चालकाच्या बँक खात्यातून पैसे वळते करुन घेतले जातील. लवकरच अशी व्यवस्था भारतात अस्तित्वात येईल, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुग्राममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना दिली. टोलनाका ओलांडताच टोलची रक्कम चालकाच्या बँक खात्यातून वळती करण्याची व्यवस्था दक्षिण कोरियात अस्तित्वात आहे. मे महिन्यात दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती भारतात येत आहेत. त्यांच्यासोबत टोलच्या नव्या व्यवस्थेसह अनेक विषयांसंदर्भातील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. 'टोल नाक्यांवरील वाहनांच्या रांगांमुळे अनेकदा वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडीच्या समस्येमागील हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं गडकरींनी सांगितलं. टोलची नवी व्यवस्था यासह अनेक विषयांसाठी भारत आणि दक्षिण कोरियात सामंजस्य करार होऊ शकतात. लवकरच दिल्ली ते अलवर-सवाई माधोपूर-वडोदरा मार्गे मुंबई अशा एक्स्प्रेस हायवेचं काम सुरू होणार आहे. यातील पहिला टप्पा वडोदरा ते मुंबई असेल. यासाठी 44 हजार कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या एक्स्प्रेस वेसाठी एक लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे दिल्ली-मुंबई प्रवासासाठी लागणारा कालावधी 12 तासानं कमी होईल. सध्या या प्रवासासाठी 24 तास लागतात.  

टॅग्स :tollplazaटोलनाकाNitin Gadkariनितीन गडकरी