शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

Nitin Gadkari: “सुरक्षेमध्ये तुम्ही झीरो आहात”; नितीन गडकरींनी दिग्गज कार कंपन्यांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 20:10 IST

Nitin Gadkari: आता नितीन गडकरींनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून देशातील दिग्गज कार कंपन्यांना चांगलेच सुनावल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी चर्चेत आहेत. इंधनदरवाढ तसेच त्याला पर्याय म्हणून इथेनॉलच्या वापराला प्राधान्य देण्यात येणार असून, फ्लेक्स इंजिनाबाबतची योजना तीन महिन्यात आणणार असल्याचे नितीन गडकरी यांनी अलीकडेच सांगितले. यानंतर आता नितीन गडकरींनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून देशातील दिग्गज कार कंपन्यांना चांगलेच सुनावल्याचे सांगितले जात आहे. (nitin gadkari criticised indian carmakers over vehicle safety)

रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहन उत्पादकांनी त्यांची गुणवत्ता व मानके सतत सुधारावीत. तसेच सुरक्षा-गुणवत्तेच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार वाहन उत्पादकांनी सुधारणा करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना केले. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी कार निर्माता कंपन्यांना फटकारले. याशिवाय ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सवर (ओईएम) कडक शब्दांत टीका केली.

“आता कुणाला काय सीडी लावायची, ती त्यांनी लावावी”; भाजपचा एकनाथ खडसेंना टोला

गुणवत्ता निकृष्ट दर्जाची

भारतीय वाहन उद्योगात ओईएमचा मोठा वाटा आहे, तरीही ते अत्यंत खराब कामगिरी करत आहेत, या शब्दांत कार निर्मात कंपन्यांना सुनावत अपघात कमी करण्यासाठी रस्ते विकासाच्या सर्व टप्प्यांवर सेफ्टी ऑडिट करणे अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. 

गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता

वाहनांच्या पायाभूत सुविधांची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे. वाहन उत्पादकांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आपल्या वाहानांमध्ये सतत सुधारणा करण्याचे आवाहन करतो. सुरक्षेसाठी लागणारा खर्च वाढविला गेला तरीही त्याबाबत तडजोड न करण्याची मोठी जबाबदारी वाहन कंपन्यांवर आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

दरम्यान, कोणत्याही नवीन किंवा आधीपासून बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरू करण्याआधी त्या मार्गाचे सुरक्षा ऑडिट करावे लागणार आहे. या ऑडिटमध्ये संबंधित रस्त्यावर अपघाताची शक्यता आहे की नाही, हे तपासून बघितल्यानंतरच किंवा जोपर्यंत एखादा रस्ता सुरक्षित होत नाही तोपर्यंत त्या रस्त्यावर वाहतूकीची परवानगी नसेल, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobile Industryवाहन उद्योगcarकार