शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

"... म्हणून मला दिल्लीत यायला आवडत नाही", असं का म्हणाले नितीन गडकरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:10 IST

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमाला संबोधित केले.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतीलप्रदूषण गेल्या काही दिवसांपासून अत्यंत धोकादायक पातळीवर आहे. दिल्लीत प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम सर्वांवर होताना दिसत आहे. दरम्यान, या प्रदूषणामुळेच राजधानी दिल्लीत यावेसे वाटत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी, राजधानी दिल्ली हे असे शहर आहे, जिथे मला राहायला आवडत नाही. येथील प्रदूषणामुळे मला संसर्ग होतो, असे नितीन गडकरी म्हणाले. तसेच, पुढे ते म्हणाले, "मी प्रत्येक वेळी दिल्लीत येतो, तेव्हा मला असे वाटते की मी येथे येऊ नये, कारण येथे इतके भयंकर प्रदूषण आहे."

याचबरोबर, दिवसेंदिवस वाढणारी प्रदूषणाची पातळी कमी करण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले की, प्रदूषण कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे. असे झाल्यास प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट होऊ शकते. भारत २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो, जे अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे. पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देऊन आपण जीवाश्म इंधनाची आयात कमी करू शकतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

बेरोजगारी ही भारताची प्रमुख समस्या - गडकरीदरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे गडकरी अनेकदा चर्चेतही असतात. या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, भारतासमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे गरिबी, उपासमार आणि बेरोजगारी आहे, त्यामुळे आगामी काळात आर्थिक आणि सामाजिक समता साधण्याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे.

राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा परिणामराजधानी दिल्लीत रहिवाशांना मंगळवारी हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा दिसून आली. दिल्लीतील अनेक भागात सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सकाळी २७४ वर राहिला, जो सलग तिसऱ्या दिवशी दिलासा देणारा आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत या महिन्याच्या सुरुवातीला (डिसेंबर) राजधानी दिल्ली आणि आसपास राहणाऱ्या लोकांसाठी श्वास घेणे तुलनेने सोपे झाले आहे. मात्र, सध्या प्रदूषण गंभीर अवस्थेत आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीdelhiदिल्लीpollutionप्रदूषण