शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

सोने योजनेद्वारे नीरव मोदीला ‘अभय’, भाजपाचा काँग्रेसवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:30 IST

सार्वजनिक उपक्रम कंपन्यांना सोने आयातीची संमती असताना काँग्रेसने खासगी कंपन्यांनाही ती देत एकूण १३ कंपन्यांना विशेष लाभ दिला. त्यात नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या कंपन्यांचाही समावेश होता, असा आरोप केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला. यामुळे पीएनबी घोटाळ्याला नवे वळण आले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली - सार्वजनिक उपक्रम कंपन्यांना सोने आयातीची संमती असताना काँग्रेसने खासगी कंपन्यांनाही ती देत एकूण १३ कंपन्यांना विशेष लाभ दिला. त्यात नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या कंपन्यांचाही समावेश होता, असा आरोप केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला. यामुळे पीएनबी घोटाळ्याला नवे वळण आले आहे.चालू खात्यातील तूट २०१३ मध्ये चिंतेचा विषय होता. यामुळे सोने आयातीवर मर्यादा होत्या. त्या स्थितीत तत्कालिन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ८०:२० सोने योजनेला मान्यता दिली. ही योजना नोव्हेंबर २०१४ मध्ये बंद झाली. मात्र २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतरही सात कंपन्यांना याचा लाभ देण्यात आला. हा लाभ कोणी व कसा दिला, हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व चिदंबरम यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केली.या योजनेत व्यावसायिकांना आयात सोन्याची ८० टक्के विक्री देशात व २० टक्के निर्यातीची मुभा होती. १३ कंपन्यांनी याचा लाभ घेतल्याने सरकारच्या झालेल्या नुकसानीचे संसदेच्या लोकलेखा समितीच्या उपसमितीने चौकशी सुरू केली आहे. भाजपचे खा. निशीकांत दुबे या उप समितीचे अध्यक्ष आहेत.या समितीने चौकशी सुरू केली असून वित्त सचिवांसह केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, केंद्र्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळ व अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाºयांना सर्व दस्तावेजांसह हजेरी लावण्याची सूचना समितीने केली आहे.विपुल अंबानीला न्यायालयीन कोठडीनीरव मोदी याच्या फायरस्टार डायमंड कंपनीचा अध्यक्ष (वित्त) विपुल अंबानी याच्यासह अर्जुन पाटील कपिल खंडेलवाल, नीतेन शाही, राजेश जिंदल व कविता माणकीकर यांना १९ कंपन्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीCrimeगुन्हा