शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 10 जणांचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे निपाह व्हायरस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 14:58 IST

देशात जीवघेणा व अत्यंत दुर्मिळ निपाह विषाणूच्या(Virus) संसर्गामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्यानं घबराट पसरली आहे.

तिरुवअंनतपुरुम - देशात जीवघेणा व अत्यंत दुर्मिळ निपाह विषाणूच्या(Virus) संसर्गामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्यानं घबराट पसरली आहे. केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह विषाणू जलद गतीनं पसरत आहे. या विषाणूमुळे येथील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी 25 जणांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये निपाह विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. निपाह विषाणूचा धोका लक्षात घेता केरळ सरकारनं केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. केरळ सरकारच्या मागणीची गांभीर्यानं दखल घेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डानं नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी)चं पथक केरळमध्ये पाठवण्याचे आदेश दिलेत.  

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरत आहे. 1998 साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणूबाबतची प्रकरणं समोर आली होती. यामुळे या विषाणूला 'निपाह' असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता. 2004मध्ये बांगलादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे.  

(सावधान... निपाह विषाणू ठरतोय जीवघेणा; ही लक्षणं दिसताच त्वरित उपचार घ्या!)

- निपाह विषाणूबाबतची माहिती मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरणारा निपाह हा गंभीर संसर्गजन्य विषाणू आहे. यास NiPah Virus Encephalitis (Encephalitis म्हणजे मेंदूला आलेली सूज) असंही म्हटलं जातं. या संसर्ग फळ-फुलांद्वारे होतो. खजुराचे उत्पन्न घेणाऱ्या लोकांमध्ये या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती समोर आली आहे. 2004 साली या विषाणूमुळे बांगलादेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते.  

- निपाह विषाणू संसर्गाची लक्षणंरुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.मेंदूमध्ये जळजळ होते.  मेंदूला सूजदेखील येण्याची शक्यता असते. ताप, डोकेदुखी, चक्कर येणे.डॉक्टरांनुसार काही प्रकरणांमध्ये योग्य वेळेत निदान किंवा उपचार न झाल्यास रुग्ण कोमामध्ये जाण्याचीही शक्यता असते. 

- कशी घ्याल स्वतःची काळजी?निपाह विषाणूवर अद्यापपर्यंत प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची लागण होऊ नये यासाठी फळं विशेषतः खजूर खाणं टाळले पाहिजे. जमिनीवर पडलेली फळं खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. आजारी डुक्कर तसंच अन्य प्राण्यांपासून दूर राहिले पाहिजे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीलाही याचा संसर्ग होतो. त्यामुळे विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूKeralaकेरळDeathमृत्यू