शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

निपाह व्हायरस रुग्णांची संख्या वाढली; केरळपासून कर्नाटकपर्यंत चिंता, किती धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 12:13 IST

या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून आवश्यक पाऊले उचलण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

नवी दिल्ली – निपाह व्हायरसच्या ताज्या आकडेवारीनं केरळमध्ये खळबळ माजली आहे. राज्यात या व्हायरसचे आतापर्यंत ६ रुग्ण आढळले आहेत. या ६ रुग्णांपैकी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील निपाह व्हायरसच्या धास्तीने शेजारील कर्नाटक राज्यही अलर्ट झाले आहे. केरळमध्ये अनावश्यक प्रवास टाळा असं सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. केरळमध्ये या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची मोबाईल बायोसेफ्टी लेवलची लॅबोरेटरी कोझिकोडला पाठवली आहे.

या व्हायरसबाबत माहिती देताना केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज म्हणाल्या की, निपाह व्हायरसची पुष्टी झाली असून हा बांगलादेशचा व्हेरिएंट आहे. हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संक्रमित करतो. यात मृत्यूदर अधिक असला तरी संक्रमण कमी आहे. मानवी मेंदूला नुकसान पोहचवणाऱ्या या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून आवश्यक पाऊले उचलण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

बांगलादेशी व्हेरिएंट किती धोकादायक?

जॉर्ज यांनी सांगितले की, निपाह व्हायरसचा बांगलादेशी व्हेरिएंट किलर आहे. याच्या संक्रमणाने मृत्यूचा धोका अधिक वाढतो. बांगलादेशी व्हेरिएंटचा मृत्यू दर ७० टक्के आहे. वेळीच हा व्हायरस रोखला नाही तर निपाह व्हायरस महामारीचं स्वरुप घेऊ शकतो. परंतु निपाहच्या बांगलादेशी व्हेरिएंटचे संक्रमण दर कमी असल्याने ते दिलासादायक आहे. म्हणजे हा व्हेरिएंट इतरांच्या तुलनेत कमी पसरतो.

निपाह व्हायरसमुळे कर्नाटकात अलर्ट

केरळमधील निपाह व्हायरसचा धोका लक्षात घेता कर्नाटक आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ज्यात केरळमधील व्हायरस प्रभावित भागात अनावश्यक प्रवास करणे टाळा असं आवाहन जनतेला केले आहे. केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यात दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि म्हैसूर आणि कर्नाटक राज्य प्रवेश एन्ट्रीवर देखरेख वाढवण्यात आली आहे.

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूKeralaकेरळ