शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

'माणसानं निसर्गाचं नुकसान केल्यामुळेच निपाह विषाणूचं थैमान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:41 IST

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचा पत्रकारांशी संवाद

रायपूर : माणसानं निसर्गाला हानी पोहोचवल्यामुळेच निपाह विषाणूचा फैलाव होतो, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये अद्याप निपाह विषाणूचा कहर कायम आहे. यामुळे आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये नड्डा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकार केरळमधील स्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 'माणसानं निसर्गाचं नुकसान केल्यामुळेच निपाहसारख्या विषाणूचा संसर्ग होतो. निपाह हे मानवनिर्मित संकट नाही. हा विषाणू निसर्गातूनच पसरतो,' असं नड्डा म्हणाले. निपाह विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचं मॅपिंग करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याशिवाय विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचंही मॅपिंग करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 'निपाह विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांपर्यंत 12 तासांमध्ये वैद्यकीय मदत पोहोचवली जात आहे. यासोबतच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स), सफदरजंग रुग्णालय पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलजी आणि नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलचे डॉक्टर केरळच्या आरोग्य विभागाच्या संपर्कात असून त्यांना संपूर्ण सहकार्य करत आहेत,' असं नड्डा यांनी सांगितलं. 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूkeralकेरळ