शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

'माणसानं निसर्गाचं नुकसान केल्यामुळेच निपाह विषाणूचं थैमान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:41 IST

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचा पत्रकारांशी संवाद

रायपूर : माणसानं निसर्गाला हानी पोहोचवल्यामुळेच निपाह विषाणूचा फैलाव होतो, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये अद्याप निपाह विषाणूचा कहर कायम आहे. यामुळे आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये नड्डा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकार केरळमधील स्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 'माणसानं निसर्गाचं नुकसान केल्यामुळेच निपाहसारख्या विषाणूचा संसर्ग होतो. निपाह हे मानवनिर्मित संकट नाही. हा विषाणू निसर्गातूनच पसरतो,' असं नड्डा म्हणाले. निपाह विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचं मॅपिंग करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याशिवाय विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचंही मॅपिंग करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 'निपाह विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांपर्यंत 12 तासांमध्ये वैद्यकीय मदत पोहोचवली जात आहे. यासोबतच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स), सफदरजंग रुग्णालय पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलजी आणि नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलचे डॉक्टर केरळच्या आरोग्य विभागाच्या संपर्कात असून त्यांना संपूर्ण सहकार्य करत आहेत,' असं नड्डा यांनी सांगितलं. 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूkeralकेरळ