शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

नव्वदीच्या आजी-आजोबांनी परतवले कोरोनाला; कुटुंबातील पाचही जण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 06:32 IST

जागतिक आरोग्य संघटनेने ज्येष्ठ आणि दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे जाहीर केले आहे.

थिरुवअनंतपुरम : वयाची ९३ वर्षे पार केलेली... हृदयरोगाचा त्रास... श्वास घेण्यास होणारी अडचण... ढासळत्या आरोग्याच्या अत्यंत खडतर वळणावर असतानाही केरळमधील आजोबांनी कोरोनाला हरविले. त्यांची ८८ वर्षांची पत्नी, तसेच मुलगा, सून आणि नातू असे पाचही जण आजारातून खडखडीत बरे झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने ज्येष्ठ आणि दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे जाहीर केले आहे. त्याला आजी-आजोबांनी खोटे ठरविले. अर्थात त्यांना बरे करण्यासाठी झटणाऱ्या केरळमधील कोट्टायम वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पथकाचाही मोठा वाटा आहे. पथानमथिट्टा येथील ९३ वर्षीय आजोबांचा मुलगा, सून आणि नातू फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात इटलीहून परत आला होता. त्या सर्वांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यामार्फत आई-वडिलांनाही कोरोनाची लागण झाली.

कोरोना ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी अधिक घातक असल्याचे मानले जाते. त्यातच आजोबांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला. त्यांना श्वास घेण्यातही अडचण येत होती. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासप्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ७ डॉक्टरांचे पथक, ४० वैद्यकीय कर्मचारी आणि २५ नर्सदेखील देखभालीसाठी हजर होत्या.

आजी-आजोबांनी सुरुवातीस उपचार घेण्यास मनाई केली होती. तसेच, घरी सोडण्याची विनंती केली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चांगल्या उपचारसेवेचे आश्वासन त्यांना दिले. त्यांच्यावर उपचार करणाºया एका नर्सलादेखील कोरोनाची बाधा झाली. केरळचे वैद्यकीयमंत्री के. के. शैलजा यांनी नर्सशी संवाद साधत संपूर्ण वैद्यकीय देखभालीची जबाबदारी घेतली.

तसेच, आजोबांसह त्यांच्या घरातील पाच व्यक्तीवंर तब्बल २४ दिवस उपाचार करण्यात आले. आता पाचही जण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ‘कुटुंबातील पाचही व्यक्ती दोनशे टक्के बरे झाले असल्याचा विश्वास डॉ. आशिष मोहन आाणि शरत यांनी व्यक्त केला. पुढील दोन आठवडे त्यांना घराबाहेर पडण्याची सक्त मनाई आरोग्य विभागाने केली आहे.

माझी चूक झाली : आजोबांच्या मुलाची कबुली

केरळ सरकारचे मी आभार मानतो. त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे मी कृतज्ञ आहे. मात्र, माझ्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याची कबुली आजोबांच्या मुलाने दिली आहे. इटलीतील व्हेनिसवरून मी दोन वेगळ््या विमानांची सेवा घेत २९ फेब्रुवारी रोजी भारतात परतलो. मात्र, त्याची माहिती मी प्रशासनाला कळविली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ