शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

दिल्ली हादरली; 24 तासांत नऊ हत्या; केजरीवालांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 21:59 IST

देशाची राजधानी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असते.

दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये नऊ हत्या करण्यात आल्या. दक्षिण दिल्लीमध्ये एक व्यक्तीने त्याच्या तीन मुलांसह पत्नीचीही गळा चिरून खून केल्याने दिल्ली हादरली आहे. तर वसंतकुंजमध्ये एका वृद्ध दांपत्यासह त्यांच्या नोकराचीही हत्या केल्याने थरकाप उडाला आहे. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांना जबाबदार धरले होते. आता त्यांनी या हत्यांसाठी कोणाला प्रश्न विचारावा असा प्रश्न पडल्याचे म्हटले आहे. 

देशाची राजधानी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असते. दर दिवशी काही ना काही खून, चोऱ्या, बलात्कारासारख्या घटना घडत असतात. यासाठी कधी दिल्ली पोलिसांकडे कमी मनुष्यबळ तर कधी अन्य कारणे सांगितली जातात. मात्र, एवढे असूनही आजपर्यंत कोणतीही रणनीती बनविण्यात आलेली नाही. 

आपच्या नेता आतिशी मार्लेना यांनी रविवारी सांगितले की, गेल्याच महिन्यात दिल्लीमध्ये 220 हून जास्त वेळा गोळीबाराच्या घटना झाल्या आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, केंद्र सरकार दिल्लीची सुरक्षा व्यवस्था सुधरविण्यात अपयशी ठरली आहे. महिलांना सायंकाळी घराबाहेर पडण्याची भीती वाटू लागली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

दरम्यान, आपने विधानसभा निवडणुकीत दिल्लीभर तीन लाख सीसीटीव्ही कॅमेरांचे जाळे उभारण्याचे आश्वासन दिले होते. कारण तेव्हा निर्भया बलात्कार प्रकरणाने वातावरण तापलेले होते. अद्याप सीसीटीव्ही न लागल्यावरून भाजपा आपला नेहमीच कात्रीत पकडत आली आहे. मात्र, आपने सांगितले की सीसीटीव्ही बसविण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. पुढील तीन महिन्यांत शहरात तीन लाख सीसीटीव्ही लावण्यात येतील. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाMurderखून