शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

दिल्ली हादरली; 24 तासांत नऊ हत्या; केजरीवालांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 21:59 IST

देशाची राजधानी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असते.

दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये नऊ हत्या करण्यात आल्या. दक्षिण दिल्लीमध्ये एक व्यक्तीने त्याच्या तीन मुलांसह पत्नीचीही गळा चिरून खून केल्याने दिल्ली हादरली आहे. तर वसंतकुंजमध्ये एका वृद्ध दांपत्यासह त्यांच्या नोकराचीही हत्या केल्याने थरकाप उडाला आहे. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांना जबाबदार धरले होते. आता त्यांनी या हत्यांसाठी कोणाला प्रश्न विचारावा असा प्रश्न पडल्याचे म्हटले आहे. 

देशाची राजधानी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असते. दर दिवशी काही ना काही खून, चोऱ्या, बलात्कारासारख्या घटना घडत असतात. यासाठी कधी दिल्ली पोलिसांकडे कमी मनुष्यबळ तर कधी अन्य कारणे सांगितली जातात. मात्र, एवढे असूनही आजपर्यंत कोणतीही रणनीती बनविण्यात आलेली नाही. 

आपच्या नेता आतिशी मार्लेना यांनी रविवारी सांगितले की, गेल्याच महिन्यात दिल्लीमध्ये 220 हून जास्त वेळा गोळीबाराच्या घटना झाल्या आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, केंद्र सरकार दिल्लीची सुरक्षा व्यवस्था सुधरविण्यात अपयशी ठरली आहे. महिलांना सायंकाळी घराबाहेर पडण्याची भीती वाटू लागली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

दरम्यान, आपने विधानसभा निवडणुकीत दिल्लीभर तीन लाख सीसीटीव्ही कॅमेरांचे जाळे उभारण्याचे आश्वासन दिले होते. कारण तेव्हा निर्भया बलात्कार प्रकरणाने वातावरण तापलेले होते. अद्याप सीसीटीव्ही न लागल्यावरून भाजपा आपला नेहमीच कात्रीत पकडत आली आहे. मात्र, आपने सांगितले की सीसीटीव्ही बसविण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. पुढील तीन महिन्यांत शहरात तीन लाख सीसीटीव्ही लावण्यात येतील. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाMurderखून