शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली हादरली; 24 तासांत नऊ हत्या; केजरीवालांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 21:59 IST

देशाची राजधानी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असते.

दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये नऊ हत्या करण्यात आल्या. दक्षिण दिल्लीमध्ये एक व्यक्तीने त्याच्या तीन मुलांसह पत्नीचीही गळा चिरून खून केल्याने दिल्ली हादरली आहे. तर वसंतकुंजमध्ये एका वृद्ध दांपत्यासह त्यांच्या नोकराचीही हत्या केल्याने थरकाप उडाला आहे. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांना जबाबदार धरले होते. आता त्यांनी या हत्यांसाठी कोणाला प्रश्न विचारावा असा प्रश्न पडल्याचे म्हटले आहे. 

देशाची राजधानी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असते. दर दिवशी काही ना काही खून, चोऱ्या, बलात्कारासारख्या घटना घडत असतात. यासाठी कधी दिल्ली पोलिसांकडे कमी मनुष्यबळ तर कधी अन्य कारणे सांगितली जातात. मात्र, एवढे असूनही आजपर्यंत कोणतीही रणनीती बनविण्यात आलेली नाही. 

आपच्या नेता आतिशी मार्लेना यांनी रविवारी सांगितले की, गेल्याच महिन्यात दिल्लीमध्ये 220 हून जास्त वेळा गोळीबाराच्या घटना झाल्या आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, केंद्र सरकार दिल्लीची सुरक्षा व्यवस्था सुधरविण्यात अपयशी ठरली आहे. महिलांना सायंकाळी घराबाहेर पडण्याची भीती वाटू लागली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

दरम्यान, आपने विधानसभा निवडणुकीत दिल्लीभर तीन लाख सीसीटीव्ही कॅमेरांचे जाळे उभारण्याचे आश्वासन दिले होते. कारण तेव्हा निर्भया बलात्कार प्रकरणाने वातावरण तापलेले होते. अद्याप सीसीटीव्ही न लागल्यावरून भाजपा आपला नेहमीच कात्रीत पकडत आली आहे. मात्र, आपने सांगितले की सीसीटीव्ही बसविण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. पुढील तीन महिन्यांत शहरात तीन लाख सीसीटीव्ही लावण्यात येतील. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाMurderखून