शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

नऊ मैतेई संघटनांवर आणखी पाच वर्षे बंदी; कारवायांना आळा घालण्यासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 09:33 IST

या संघटनांची कृत्ये भारताचे सार्वभौमत्व व अखंडतेसाठी हानिकारक मानली जातात.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नऊ मैतेई बंडखोर संघटनांवरील बंदी सोमवारी आणखी पाच वर्षांसाठी वाढवली. या संघटनांच्या फुटीरवादी, घातपाती, दहशतवादी व हिंसक कारवायांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे.

अधिसूचनेत म्हटले आहे की, या संघटनांची कृत्ये भारताचे सार्वभौमत्व व अखंडतेसाठी हानिकारक मानली जातात. या संघटना सुरक्षा दले, पोलिस व नागरिकांवर हल्ले करण्यासह देशाचे सार्वभौमत्व व अखंडतेला बाधा पोहोचवणाऱ्या कारवाया करत आहेत, असे सरकारला वाटत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. सशस्त्र संघर्षाद्वारे भारतापासून मणिपूर वेगळे करून स्वतंत्र राष्ट्राची स्थापना करणे आणि मणिपूरच्या स्थानिक लोकांना फुटीर कारवायांसाठी भडकवणे हे या संघटनांचे उद्दिष्ट आहे. 

या आहेत त्या संघटना

पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) व तिची राजकीय शाखा रिव्होल्युशनरी पीपल्स फ्रंट (आरपीएफ), द युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (यूएनएलएफ) आणि तिची सशस्त्र शाखा मणिपूर पीपल्स आर्मी (एमपीए), पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ कांगलीपाक आणि तिची सशस्त्र शाखा, ‘रेड आर्मी’, कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टी (केसीपी) आणि तिची सशस्त्र शाखा, तिलासुद्धा ‘रेड आर्मी’ म्हटले जाते, कांगलेई याओल कानबा लुप (केवायकेएल), समन्वय समिती (सीओआरसीओएम) व अलायन्स फॉर सोशलिस्ट युनिटी कांगलीपाक (एएसयूके) आणि या संघटनांचे सर्व गट, शाखा आणि आघाड्या. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार