शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढली! पुढील ९ वर्षांत ९ मोठी शहरं बुडणार; कोट्यवधी लोकांची झोप उडवणारा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 09:43 IST

समुद्राच्या किनारी वसलेल्या शहरांसाठी धोक्याची घंटा; कोट्यवधींचा जीव टांगणीला

जागतिक तापमानवाढीचं संकट दिवसागणिक गहिरं होत चाललं आहे. जगातील अनेक शहरं २१०० पर्यंत पाण्याखाली जाणार आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळू लागला आहे. हिमकडे कोसळून समुद्रातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर वसलेल्या शहरांना मोठा निर्माण झाला आहे. क्लायमेट सेंट्रल नावाच्या प्रकल्पाअंतर्गत जागतिक तापमान वाढीसंदर्भात एक अहवाल तयार करण्यात आला आहे.

जागतिक तापमानवाढीचा वेग आणि त्यामुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यांचा विचार करून अहवाल तयार करण्यात आला. समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना असेल याची यादी अहवालात आहे. त्यानुसार पुढील ९ वर्षांत ९ मोठी शहरं पाण्याखाली जातील. या यादीत भारतामधील कोलकात्याचा समावेश आहे.

पश्चिम बंगालची राजधानी असलेलं कोलकाता शहर २०३० पर्यंत पाण्याखाली जाऊ शकतं. मान्सूनचा पाऊस आणि भरती यामुळे कोलकात्यात अनेकदा पूर परिस्थिती निर्माण होते. संपूर्ण शहरात पाणी साचतं. पावसाच्या पाण्याचा निचरा लगेच होत नाही. त्यामुळे कोलकात्याला मोठा धोका आहे. याशिवाय समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्यानं दुहेरी संकट आहे.

कोणत्या शहरांना तापमानवाढीचा धोका?१. ऍमस्टरडॅम, नेदरलँड२. बसरा, इराक३. न्यू ओरलींस, अमेरिका४. वेनिस, इटली५. हो ची मिन्ह, व्हिएतनाम६. कोलकाता, भारत७. बँकॉक, थायलंड८. जॉर्जटाऊन, गयाना९. सवाना, अमेरिका