शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

त्याला 'हे' यश बघताच आलं नाही, 'भारत बंद'च्या वेळी झाला होता निखिलचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 09:59 IST

निखिलचं यश पाहून त्याच्या आई-वडिलांना अश्रु अनावर होत आहेत.

गाझियाबाद- एससी /एसटी कायद्याला शिथिल करण्याविरोधात 2 एप्रिल रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदच्या वेळी काही ठिकाणी हिंसाचारही झाला. यावेळी गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला होता. निखिल असं त्या मुलाचं नाव आहे. पण आज निखिलचं यश पाहून त्याच्या आई-वडिलांना अश्रु अनावर होत आहेत. पाचवीत शिकणाऱ्या निखिलने परीक्षेमध्ये टॉप केलं आहे. परीक्षेसाठी इतकी मेहनत घेतली पण ते यश पाहायला आज निखिल जिवंत नाहीये. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

कृशियन कॉलनी भागूमध्ये राहणारा निखिल भारत बंदच्या दिवशी सिब्बनपुरामध्ये राहणाऱ्या त्याच्या मावशीच्या घरी गेला होता. सकाळी जवळपास 11 वाजेच्या सुमारास तो गोशाळेपासून चालत घरी चालला होता. त्याचवेळी तिथे आंदोलकर्त्यांनी पोलिसांच्या एका बाईकला आग लावल्याने पळापळ झाली. त्या धावपळीत निखिलला कुणीतरी धक्का दिला व तो आगीत पडला, असा आरोप निखिलच्या वडिलांनी केला आहे. मुलगा आगीच्या तावडीत सापडला असल्याचं आम्ही पाहिलं लगेचच आग विझवून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असं स्थानिकांनी सांगितलं. 

मुलाच्या वडिलांनी पोलिसांना याबद्दल सांगितलं तेव्हा पोलिसांनी आधी मुलावर उपचार करण्याचा सल्ला दिला. नंतर मुलगा बरा झाल्यावर तक्रार दाखल करू, असं पोलिसांनी सांगितलं होतं. आंदोलनादरम्यान मुलगा जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी मीडियालाही दिली, असा आरोप आहे. पोलिसांनी हे सगळं मुद्दाम केलं, असा आरोप केला जातो आहे.