शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

त्याला 'हे' यश बघताच आलं नाही, 'भारत बंद'च्या वेळी झाला होता निखिलचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 09:59 IST

निखिलचं यश पाहून त्याच्या आई-वडिलांना अश्रु अनावर होत आहेत.

गाझियाबाद- एससी /एसटी कायद्याला शिथिल करण्याविरोधात 2 एप्रिल रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदच्या वेळी काही ठिकाणी हिंसाचारही झाला. यावेळी गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला होता. निखिल असं त्या मुलाचं नाव आहे. पण आज निखिलचं यश पाहून त्याच्या आई-वडिलांना अश्रु अनावर होत आहेत. पाचवीत शिकणाऱ्या निखिलने परीक्षेमध्ये टॉप केलं आहे. परीक्षेसाठी इतकी मेहनत घेतली पण ते यश पाहायला आज निखिल जिवंत नाहीये. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

कृशियन कॉलनी भागूमध्ये राहणारा निखिल भारत बंदच्या दिवशी सिब्बनपुरामध्ये राहणाऱ्या त्याच्या मावशीच्या घरी गेला होता. सकाळी जवळपास 11 वाजेच्या सुमारास तो गोशाळेपासून चालत घरी चालला होता. त्याचवेळी तिथे आंदोलकर्त्यांनी पोलिसांच्या एका बाईकला आग लावल्याने पळापळ झाली. त्या धावपळीत निखिलला कुणीतरी धक्का दिला व तो आगीत पडला, असा आरोप निखिलच्या वडिलांनी केला आहे. मुलगा आगीच्या तावडीत सापडला असल्याचं आम्ही पाहिलं लगेचच आग विझवून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असं स्थानिकांनी सांगितलं. 

मुलाच्या वडिलांनी पोलिसांना याबद्दल सांगितलं तेव्हा पोलिसांनी आधी मुलावर उपचार करण्याचा सल्ला दिला. नंतर मुलगा बरा झाल्यावर तक्रार दाखल करू, असं पोलिसांनी सांगितलं होतं. आंदोलनादरम्यान मुलगा जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी मीडियालाही दिली, असा आरोप आहे. पोलिसांनी हे सगळं मुद्दाम केलं, असा आरोप केला जातो आहे.