शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

Maharashtra Politics: “निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही”; निहार ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 18:52 IST

Maharashtra News: शिवसेना हा पक्ष मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालतोय आणि यापुढे चालत राहील, असे निहार ठाकरेंनी नमूद केले.

Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजून दिला. यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर उद्धव ठाकरे यांचे बंधू बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही, अशी खात्री वाटते, असा विश्वास व्यक्त केला. 

या याचिकेच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असली तरी आयोगाच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार देत शिंदे गटाला दिलासा दिला. यानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत. सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेत निहार ठाकरे हे शिंदे गटाच्या बाजूने आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निहार ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. 

निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही

सर्वोच्च न्यायालयात समोरच्या बाजूने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर युक्तिवाद झाला. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतली आहे. पुढच्या तारखेपर्यंत कोणत्याही बाजूच्या आमदार-खासदारांना अपात्र करता येणार नाही. आम्हाला दोन आठवडे उत्तर दाखल करण्यास दिले आहेत. पण आम्हाला खात्री आहे की, निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही, असे निहार ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालतोय

शिवसेना हा पक्ष मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालतोय आणि यापुढे चालत राहील. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचे आम्ही स्वागत करतो निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती देण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, तशी स्थगिती दिलेली नाही. आता जेव्हा सुनावणी सुरु होईल, तेव्हा आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णय कसा योग्य होता, हे पटवून देवू, असा निर्धार निहार ठाकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आम्ही सर्वोच्च न्यायालयात तोंडी आश्वासन दिले आहे. बँक खाते, प्रॉपर्टी हे पक्षाचे होते. आता पक्ष एकनाथ शिंदे चालवत आहेत. ज्यांच्याकडे आता पक्षच उरला नाही, त्यांचा पक्षाच्या कोणत्याही वस्तूवर अधिकार उरला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मात्र यावर कोणताही निर्णय दिलेला नाही. कारण हे मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडले गेले नव्हते, अशी माहिती निहार ठाकरे यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे