शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नाइटलाइफला ग्रीन सिग्नल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 06:04 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी दुकाने आणि अन्य व्यापारी आस्थापनांमधील नोकरी आणि त्यासंबंधीच्या सेवाशर्तींचे नियमन करणाऱ्या आदर्श कायद्याच्या विधेयकास मंजुरी दिली.

नवी दिल्ली : संपूर्ण देशात एकसमानता असावी यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी दुकाने आणि अन्य व्यापारी आस्थापनांमधील नोकरी आणि त्यासंबंधीच्या सेवाशर्तींचे नियमन करणाऱ्या आदर्श कायद्याच्या विधेयकास मंजुरी दिली. यामुळे मॉल, चित्रपटगृहे, उपाहारगृहे, दुकाने, बँका व अन्य तत्सम कामाची ठिकाणे अहोरात्र उघडी ठेवण्याची मुभा मिळेल. या नव्या कायद्यामुळे लाइटलाइफला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या आदर्श कायद्यात अशा व्यापारी आस्थापनांमध्ये महिलांनाही रात्रपाळीत कामावर ठेवण्याची तरतूद आहे. मात्र यासाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघर, महिला स्वच्छतागृह यासारख्या सुविधांखेरीज महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण करण्यासाठी खास टॅक्सीसेवा उपलब्ध करणे मालकांवर बंधनकारक असेल. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १९४८ चा ‘फॅक्टरी अ‍ॅक्ट’ ज्यांना लागू होत नाही व जेथे १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी काम करतात असे कारखाने वगळून सर्व आस्थापनांना हा नवा कायदा लागू होईल. यात छापखाने, बँका, विमा कंपन्या, शेअर दलालांची कार्यालये, चित्रपटगृहे, दुकाने, मॉल यासह सार्वजनिक मनोरंजनाशी संबंधित अन्य सर्व कामाच्या ठिकाणांचा समावेश असेल.विशेष म्हणजे गोदामे आणि जेथे वस्तूंच्या पॅकेजिंगचे काम चालते अशा ठिकाणांनाही हा कायदा प्रथम लागू होणार आहे. यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांची सोय होईल. कामगार संघटनांनी मात्र यास विरोध केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)राज्यांना पर्याय उपलब्धहा कायदा सर्वसामान्यांच्या भाषेत गुमास्ता कायदा म्हणून ओळखला जातो व सर्व राज्यांमध्ये त्यांनी केलेले असे कायदे थोड्याफार फरकाने गेली कित्येक वर्षे लागू आहेत. कामगार हा विषय राज्यांच्या अखत्यारीत असल्याने राज्यघटनेनुसार या विषयावर फक्त राज्य विधिमंडळेच कायदे करू शकतात. केंद्राने एक आदर्श विधेयक तयार केले आहे. त्यानुसार जसाच्या तसा किंवा स्थानिक गरजांनुसार बदल करून कायदा करण्याचे स्वातंत्र्य राज्यांना आहे.