शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 05:18 IST

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा छडा लावण्यासाठी तपासाला वेग; प्रत्यक्षदर्शींची केली जातेय चौकशी, एनआयएच्या महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथक ठाण मांडून, अतिरेकी जेथून आले आणि गेले त्या जागांची तपासणी

नवी दिल्ली : पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा तपास एनआयएने आपल्या हाती घेतला असून, अतिरेकी कटाचा छडा लावण्यासाठी तपासाला वेग दिला आहे, तसेच प्रत्यक्षदर्शींची चौकशीही करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादविरोधी संस्थेने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर रविवारी जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला आणि  तपासकामात अनेक पथके उतरवली आहेत. मागील मंगळवारी दुपारी झालेल्या अतिरेक्यांच्या निर्घृण हल्ल्यात २६ जण ठार झाले. त्यानंतर एनआयएच्या  महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. बारीकसारीक पुरावे गोळा करण्यासाठी  पथक बुधवारपासूनच हल्ल्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसले आहे.

भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एनआयएने निवेदनात म्हटले आहे की, या संपूर्ण घटनाक्रमाची तपशीलवार माहिती घेण्यासाठी प्रत्यक्षदर्शींची सखोल चौकशी केली जात आहे. अतिरेक्यांबाबत बारीकसारीक माहिती मिळवण्यासाठी अतिरेकी जेथून आले व जेथून गेले त्या जागेची तपासणी करण्यात येत आहे. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून, अतिरेक्यांच्या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी पुरावे मिळवले जात आहेत. यासाठी फॉरेन्सिक व अन्य तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

तीन दिवसांत ५३७ पाकिस्तानी नागरिकांनी सोडला देश

भारत सोडण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना दिलेली तीन दिवसांची मुदत रविवारी संपली. या मुदतीत ५३७ पाक नागरिकांनी देश सोडला. अटारी-वाघा सीमेवरून मायदेशी पतरणाऱ्या पाक नागरिकांमध्ये ९ वकिलातीतील अधिकाऱ्यांचा समावेश होता. तर भारतीय वकिलातीतील १४ अधिकाऱ्यांसह ८५० भारतीय नागरिक अटारी-वाघा सीमा पार करून मायदेशी परतले आहेत.

हल्ला करताना अतिरेक्यांनी केला बॉडी कॅमेऱ्याचा वापर

अतिरेक्यांनी निरपराध लोकांना ठार मारण्याचे कृत्य करताना बॉडी कॅमेऱ्याचा वापर केल्याचे तपासात पुढे आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी अतिरेक्यांबाबत माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

हल्लेखोर अतिरेक्यांमध्ये तीन पाकिस्तानींचा समावेश

सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्यात सामील असणाऱ्या अतिरेक्यांची रेखाचित्रेही जारी केली आहेत. यात तीन पाकिस्तानी असून आसिफ फौजी, सुलेमान शाह व अबू तल्हा अशी या अतिरेक्यांची नावे आहेत.

२२ तास पायी चालत आले? एके-४७, एम-४ असॉल्ट रायफल्सचा वापर

तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी सुमारे २० ते २२ तास जंगलांमध्ये प्रवास करून बैसरन घाटीत पोहोचले. त्यानंतर त्यांनी हल्ला केला.

फॉरेन्सिक तपासात उघड झाले आहे की, दहशतवाद्यांनी अत्याधुनिक एके-४७ आणि एम-४ असॉल्ट रायफल्सचा वापर केला होता. घटनास्थळी सापडलेली काडतुसे या दृष्टीने महत्त्वपूर्ण पुरावे म्हणून समोर आली आहेत.

महाराष्ट्र, ओडिशातील नागरिकांचे जबाब

एनआयएच्या पथकाने महाराष्ट्र, ओडिशा व पश्चिम बंगालसह अन्य राज्यांतील पीडितांच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत.

प्रारंभिक तपासानुसार, अतिरेकी हल्ल्यात सामील असलेल्या अतिरेक्यांची संख्या पाच ते सात होती, असे पुढे आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण, तसेच किमान दोन स्थानिक अतिरेक्यांकडून मदत मिळाली होती.

आधी दुकानांच्या मागे लपले, मग समोर येऊन केला हल्ला

दहशतवादी हल्ल्याचा मुख्य साक्षीदार समोर आला असून, तो एक स्थानिक छायाचित्रकार आहे. हल्ल्यावेळी तो एका झाडावर चढून संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचे चित्रीकरण करत होता. या छायाचित्रकाराने घेतलेल्या व्हिडिओमध्ये या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात, असे एनआयएला वाटते.

त्याने केलेल्या रेकॉर्डिंगनुसार, सुरुवातीला दोन दहशतवादी दुकानांच्या मागे लपलेले होते. हेच दहशतवादी सर्वात आधी बाहेर आले आणि त्यांनी लोकांना कलमा म्हणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी चार लोकांवर गोळ्या झाडल्या. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी इकडेतिकडे पळायला सुरुवात केली.

याच दरम्यान इतर दहशतवादी झिपलाइनच्या जवळून बाहेर आले आणि गोळीबार सुरू केला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा