शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 17:33 IST

प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदीय राजकारणात उतरणार असून वायनाडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - प्रियंका गांधी या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. माझ्या आधी तिने संसदेत पोहचावं असं मला वाटतं हे विधान प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी यंदाच्या निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या जागांवर निवडणूक लढवली. त्यातील दोन्ही जागांवर ३ लाखांच्या मताधिक्याने राहुल गांधी विजयी झाले. मात्र नियमानुसार १४ दिवसांत त्यांना दोन्ही पैकी १ जागा सोडावी लागणार होती. त्याप्रमाणे राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला तर याच जागेवर प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्याचं काँग्रेसनं ठरवलं.

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी उभ्या राहणार असून त्याबाबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं की, प्रियंका ज्याप्रकारे मेहनत घेत आहे, ती खासदार म्हणून देशाला प्रगतीपथावर नेईल. मीदेखील तिला निवडणूक लढवण्यासाठी दबाव टाकला. संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे हा निर्णय घेतला. प्रियंका गांधी वायनाडमधून लढतेय त्याचा आनंद आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा प्रियंकाने संसदेत पोहचले पाहिजे असं वाड्रा यांनी सांगितले. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

तसेच प्रियंकाने आधी संसदेत पोहचावं ही माझी इच्छा होती. मी मेहनत करत राहीन, पुढील निवडणुकीत भाग घेईन. मी प्रियंकाला तू संसदेत जायला हवं हे समजावलं. कुटुंबाने एकत्रित निर्णय घेतला असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं. त्याशिवाय घराणेशाहीच्या आरोपावर आधी भाजपाने स्वत:कडे पाहावे. त्यांच्या पक्षात घराणेशाही असणारे नेते भरलेत. जनतेनं अबकी बार ४०० पारचं वास्तव दाखवलं. भाजपा अयोध्येतही हरली. राम मंदिर बनवलं परंतु लोकांची घरे उद्ध्वस्त केली. रोजगार दिले नाहीत. भाजपा नेत्यांचा अहंकार लोकांच्या पसंतीस पडला नाही अशी टीका वाड्रा यांनी केली.

दरम्यान, राहुल गांधी उत्तरेत आणि प्रियंका गांधी दक्षिणेत प्रतिनिधित्व करणार आहेत. राहुल वायनाडला आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात येत राहतील. त्यामुळे संपूर्ण देशाची माहिती मिळेल. जेव्हा प्रियंका गांधी संसदेत पहिल्यांदा बोलायला उभ्या राहतील तेव्हा माझ्या अंगावर काटा येईल. मला तिच्या भाषणाची उत्सुकता आहे असंही रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले.

राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते व्हावं

राहुल गांधी पूर्ण क्षमतेनं आणि मेहनतीनं त्यांचं काम करतायेत. त्यांनी नक्कीच विरोधी पक्षनेते बनायला हवं. पंतप्रधानपद हे आघाडी ठरवेल. आम्ही कुठल्याही पदाविषयी विचार करत नाही परंतु जर ते देशाचे पंतप्रधान झाले तर चांगलेच होईल असा विश्वास रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केला.

कधीही पलटू शकतात नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कधीही एनडीएची साथ सोडू शकतात. चंद्राबाबू नायडूही खुश नाहीत. हे सरकार मजबूत नाही तर विरोधी पक्ष मजबूत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला विचारात घेतल्याशिवाय सरकार कुठलाही निर्णय करणार नाही असंही रॉबर्ट वाड्रा म्हणाले.   

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालwayanad-pcवायनाड