शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पुढची तीन वर्ष कोणतीही निवडणूक लढणार नाही, 9 ते 5 नोकरी करणार - उमा भारती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 11:30 IST

केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी किमान पुढची तीन वर्ष आपण निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलं आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी किमान पुढची तीन वर्ष आपण निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलं आहे. प्रकृती व्यवस्थित नसल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यावेळी त्यांनी आपण राजकारणातून निवृत्त होत नसल्याचंही स्पष्ट केलं. 'मला गुडघा आणि पाठदुखीचा त्रास होत आहे. त्यासाठी मला आराम करण्याची प्रचंड गरज आहे. पुढील तीन वर्ष मी निवडणूक लढणार नाही', असं त्यांनी म्हटलं आहे. 'आपण राज्यसभेतही जाणार नाही, मात्र पक्षाचा प्रचार करत राहू', असं त्यांनी सांगितलं आहे. 

'आपल्याला 9 ते 5 नोकरी करायची आहे', अशी इच्छा उमा भारती यांनी यावेळी व्यक्त केली. 'मला संतुलित आयुष्य जगायचं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे जीवनशैली मला जगायची आहे', असं उमा भारतींनी म्हटलं आहे. 

उमा भारती यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'मी तीन दिवसांपुर्वी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती. त्यांनी 2019 पर्यंत मला केंद्रीय मंत्री म्हणून काम करायला सांगितलं आहे'. अशाप्रकारे ब्रेक घेण्यात काही गैर आणि आश्चर्यकारक नाही असं उमा भारतींनी म्हटलं आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनीही प्रकृतीच्या कारणांमुळे आपल्या राजकीय कारकिर्दीदरम्यान ब्रेक घेतला होता असं त्या बोलल्या. 

'याचा अर्थ मी राजकारणातून निवृत्ती घेतीये असं नाही', हे उमा भारती यांनी स्पष्ट केलं. 'तीन वर्षानंतरही माझ्यासाठी राजकारणात अनेक वर्ष असतील. प्रकृती अजून बिघडू नये यासाठी मी पुर्णपणे आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष देत आहे', असं उमा भारतींनी सांगितलं.