शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन कृषी कायदे रद्द झाल्यानंतर पुढे काय?; मोदींच्या मंत्र्यानं सांगितला नेक्स्ट प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 14:23 IST

केंद्रीय गृहमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितली पुढील रणनीती

नवी दिल्ली: तीन कृषी कायदे रद्द करण्यात आल्यानंतर मोदी सरकार पुढे काय करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. तीन कृषी कायदे रद्द केलेत. आता सीएए रद्द करा अशी मागणी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली. तर जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष कलम ३७० रद्द करण्यात यावं अशी मागणी करत आहेत. मात्र मोदी सरकारमधील मंत्र्यानं जम्मू-काश्मीरबद्दलचा सरकारचा पुढील प्लान सांगितला आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं जम्मू-काश्मीर पुन्हा मिळवणं सरकारचं पुढील ध्येय असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मीरपूर बलिदान दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्या नेतृत्त्वाकडे कलम ३७० हटवण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती आहे, तेच नेतृत्त्व पीओकेतील पाकिस्तानचा अवैध हटवू शकतं, असं सिंह यांनी म्हटलं.

जितेंद्र सिंह प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय उपखंडाचं विभाजन मानवी इतिहासातील सर्वात मोठी समस्या आहे. जम्मू-काश्मीरचा एक हिस्सा तत्कालीन सरकारनं गमावला. त्यामुळे पाकिस्ताननं अवैध कब्जा केला. पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं जम्मू-काश्मीर पुन्हा मिळवणं सरकारसमोरचं पुढील लक्ष्य आहे, असं सिंह म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम ३७० कधीच हटवण्यात येणार नाही असं मानलं जात होतं. मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली ते शक्य झालं. त्याच प्रकारे पीओके पुन्हा मिळवण्यातही आपण यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पीओके भारतात आणणं केवळ राजकीय अजेंडा नाही, तर तो मानवाधिकारांच्या सन्मानाचाही प्रश्न आहे, असं सिंग यांनी सांगितलं.

टॅग्स :Article 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदी