शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन कृषी कायदे रद्द झाल्यानंतर पुढे काय?; मोदींच्या मंत्र्यानं सांगितला नेक्स्ट प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 14:23 IST

केंद्रीय गृहमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितली पुढील रणनीती

नवी दिल्ली: तीन कृषी कायदे रद्द करण्यात आल्यानंतर मोदी सरकार पुढे काय करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. तीन कृषी कायदे रद्द केलेत. आता सीएए रद्द करा अशी मागणी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली. तर जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष कलम ३७० रद्द करण्यात यावं अशी मागणी करत आहेत. मात्र मोदी सरकारमधील मंत्र्यानं जम्मू-काश्मीरबद्दलचा सरकारचा पुढील प्लान सांगितला आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं जम्मू-काश्मीर पुन्हा मिळवणं सरकारचं पुढील ध्येय असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मीरपूर बलिदान दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्या नेतृत्त्वाकडे कलम ३७० हटवण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती आहे, तेच नेतृत्त्व पीओकेतील पाकिस्तानचा अवैध हटवू शकतं, असं सिंह यांनी म्हटलं.

जितेंद्र सिंह प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय उपखंडाचं विभाजन मानवी इतिहासातील सर्वात मोठी समस्या आहे. जम्मू-काश्मीरचा एक हिस्सा तत्कालीन सरकारनं गमावला. त्यामुळे पाकिस्ताननं अवैध कब्जा केला. पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं जम्मू-काश्मीर पुन्हा मिळवणं सरकारसमोरचं पुढील लक्ष्य आहे, असं सिंह म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम ३७० कधीच हटवण्यात येणार नाही असं मानलं जात होतं. मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली ते शक्य झालं. त्याच प्रकारे पीओके पुन्हा मिळवण्यातही आपण यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पीओके भारतात आणणं केवळ राजकीय अजेंडा नाही, तर तो मानवाधिकारांच्या सन्मानाचाही प्रश्न आहे, असं सिंग यांनी सांगितलं.

टॅग्स :Article 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदी