शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून वाहने चोरणारी टोळी सक्रीय चोरीचा नवा ट्रेंड : सॉफ्टवेअर इंजिनियरच्या मदतीने डॉक्टरची कार चोरल्याचा संशय

By admin | Updated: July 9, 2016 23:50 IST

जळगाव: अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करुन नव्या कार व अन्य वाहने चोरणारी टोळी उत्तर महाराष्ट्रात सक्रीय झाली आहे. चोरलेल्या वाहनांचे पार्ट वेगळे करून मोठमोठ्या गॅरेजमध्ये त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गुरुवारी रात्री रिंग रोडवरील डॉ.किशोर कमलसिंग पाटील यांची साडे सात लाखाची कार चोरी झाली, तेथेही हीच पध्दत वापरण्यात आली असून सॉफ्टवेअर इंजिनियरची त्यासाठी मदत घेतली गेल्याचा संशय आहे.

जळगाव: अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करुन नव्या कार व अन्य वाहने चोरणारी टोळी उत्तर महाराष्ट्रात सक्रीय झाली आहे. चोरलेल्या वाहनांचे पार्ट वेगळे करून मोठमोठ्या गॅरेजमध्ये त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गुरुवारी रात्री रिंग रोडवरील डॉ.किशोर कमलसिंग पाटील यांची साडे सात लाखाची कार चोरी झाली, तेथेही हीच पध्दत वापरण्यात आली असून सॉफ्टवेअर इंजिनियरची त्यासाठी मदत घेतली गेल्याचा संशय आहे.
बनावट किल्लीच्या माध्यमातून कार चोरी होणे शक्यच नसल्याचा दावा कंपनीने डॉक्टरांकडे केला आहे. या कंपनीच्या कारमध्ये इसीएम, इंजिन इन मोबिलायझेशन व अन्य एक अशा तीन यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बनावट किल्लीमुळे कदाचित कार सुरूही झाली तर शंभर मीटरच्या आत ती कार बंद पडते. स्वीचमध्ये एक चीप असते, ती बनावट किल्ली लगेच ओळखते, अशी माहिती कंपनीच्या अभियंत्यांकडून आपणाला मिळाल्याचे डॉ.पाटील म्हणाले.
तीन दिवस आधी होते रेकी
एखादे वाहन चोरी करायचे असेल तर चोरटे तीन दिवस आधी रेकी करतात. त्यानंतर त्या वाहनाचा नोंदणी व चेचीस क्रमांक मिळवतात. त्यानंतर संगणक, सॉफ्टवेअरचा वापर करून वाहन चोरी केली जाते. या प्रक्रियेत गोपनीय माहिती बाहेर जात असेल तर कंपनीतील एखाद्या व्यक्तीचा कुठेतरी संबंध येत असावा,अशी शंकाही उपस्थित होत आहे.
गॅरेजमध्ये बदलतात गाड्या
चोरी झालेल्या वाहनांचे प्रत्येक पार्ट वेगळे केले जातात. त्यातील इंजिन व चेचीस क्रमांक खोडला जातो. अपघात अथवा अन्य काही कारणाने भंगारात विक्री झालेल्या वाहनांचे आर.सी.बुक गॅरेज चालकांकडे असतेच. त्या वाहनाचा इंजिन व चेचीस क्रमांक जोडून चोरीच्या वाहनांना लावला जातो, शिवाय अधिकृत कागदपत्रे मिळत असल्याने वाहन घेणार्‍यालाही ते वाहन चोरीचे आहे अशी शंका येत नाही.
कंपनीला पत्र देणार
अंतर्गत सिस्टीम्स कमकुवत असल्यानेच कार चोरी झाल्यामुळे त्यात बदल करावा यासाठी कंपनीला पत्र देणार असल्याचे डॉ.किशोर पाटील यांनी सांगितले. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाहन चोरी करण्याची पध्दत अनेक दिवसापासून आहे, मात्र जळगावात ती पहिल्यांदाच आली आहे. धुळे व नाशिक येथेही अशी पध्दत वापरण्यात आली आहे.