शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

केंद्र सरकारचे नवे खासगीकरण धोरण तयार, मंत्रिमंडळात होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:06 IST

सूत्रांनी सांगितले की, बँकिंग आणि विमा क्षेत्रास ‘रणनीतिक क्षेत्र’ (स्ट्रॅटेजिक सेक्टर) म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. याचाच अर्थ दीर्घकालीन पातळीवर देशात सरकारी मालकीच्या प्रत्येकी चारच बँका आणि विमा कंपन्या राहतील. काही कंपन्यांचे विलीनीकरण आणि काहींची विक्री करून हे साध्य केले जाईल.

नवी दिल्ली :केंद्र सरकारचे नवे खासगीकरण धोरण तयार असून, त्यावर मंत्रिमंडळ येत्या काही आठवड्यांत चर्चा करील, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. एका उच्चस्तरीय सरकारी अधिकाºयाने सांगितले की, ४९ केंद्रीय मंत्रालये आणि विभाग यांना ‘मंत्रिमंडळ टिपण’ अभ्यासासाठी देण्यात आले होते. त्यावर सूचना आल्या. मात्र, आता अंतिम टिपण तयार झाले आहे. हे टिपण १0 ते १५ दिवसांत विचारार्थ घेतले जाऊ शकते.

सूत्रांनी सांगितले की, बँकिंग आणि विमा क्षेत्रास ‘रणनीतिक क्षेत्र’ (स्ट्रॅटेजिक सेक्टर) म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. याचाच अर्थ दीर्घकालीन पातळीवर देशात सरकारी मालकीच्या प्रत्येकी चारच बँका आणि विमा कंपन्या राहतील. काही कंपन्यांचे विलीनीकरण आणि काहींची विक्री करून हे साध्य केले जाईल.

रेल्वे, तेल व गॅस, संरक्षण, अंतराळ आणि अणुऊर्जा या क्षेत्रांनाही रणनीतिक क्षेत्र म्हणून मान्यता दिली जाईल. या क्षेत्रातही विलीनीकरण आणि खासगीकरण राबवून सरकारी कंपन्यांची संख्या चारवर मर्यादित केली जाईल. वित्तमंत्री सीतारामन यांनी ‘आत्मनिर्भर भारत पॅकेज’ अंतर्गत ‘रणनीतिक क्षेत्र’ धोरणाची घोषणा केली होती. रणनीतिक क्षेत्रात सरकारी मालकीच्या कंपन्यांची संख्या चारपेक्षा जास्त असणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. सीतारामन यांनी म्हटले होते की, सरकारी कंपन्यांची संख्या अधिक राहू नये यासाठी अधिसूचित ‘रणनीतिक क्षेत्रा’त विलिनीकरण आणि एकीकरण प्रक्रिया राबविली जाईल.

सीतारामन यांनी ही घोषणा करताना नव्या खासगीकरण धोरणासाठी कोणतीही कालमर्यादा सांगितली नव्हती. एका अधिकाºयाने सांगितले की, सरकारी कंपन्यांची संख्या कमी कधी करावी, यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही. ‘बिगर-रणनीतिक’ क्षेत्रातून सरकार पूर्णपणे बाहेर पडणार आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा