शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

GNCT Act: दिल्लीत केंद्राचा नवा कायदा लागू; आता नायब राज्यपाल हेच ‘सरकार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 14:04 IST

GNCT Act: दिल्लीत आता राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदिल्लीत नवा कायदा लागूआता नायब राज्यपाल हेच ‘सरकार’नायब राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवावे लागणार

नवी दिल्ली: एकीकडे कोरोनाचे देशभरात थैमान घातले असताना दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत केंद्राचा नवा कायदा लागू करण्यात आला असून, आता नायब राज्यपाल म्हणजेच सरकार असतील. दिल्लीत आता राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन सुधारणा कायदा लागू करण्यात आला असून, २७ एप्रिलपासून हा कायदा लागू झाला, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. (new gnct act into force now delhi comes under lieutenant governor rule)

दिल्लीत नवीन लागू झालेल्या राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन सुधारणा कायद्यानुसार आता कोणताही निर्णय घेण्याआधी नायब राज्यपालांची परवानगी घेणे सरकारला बंधनकारक असणार आहे. २२ मार्च रोजी लोकसभेत आणि २४ मार्च रोजी राज्यसभेत हे विधेयक पारित करण्यात आले होते. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावर स्वाक्षरी केली आणि याचे कायद्यात रुपांतर झाले.

आता देशाला उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल: संजय राऊत

नायब राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवावे लागणार

नवीन कायद्यानुसार, सरकारला विधायक कामांसाठीचे प्रस्ताव १५ दिवस आणि प्रशासकीय कामासंदर्भातील प्रस्ताव ७ दिवस आधी नायब राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवावे लागतील. संसदेत विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हा दिवस लोकशाहीसाठी दुःखद दिवस असल्याचे म्हटले होते. तसेच लोकनियुक्त सरकारच्या अधिकारांवर बंधने घालण्यासाठी मोदी सरकारने हे विधेयक आणल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केंद्रावर केला होता.

दरम्यान, नव्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा कायद्यामुळे दिल्लीच्या नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार मिळणार आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नायब राज्यपालांची संमती आवश्यक असणार आहे. आताच्या घडीला अनिल बैजल हे दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणArvind Kejriwalअरविंद केजरीवालCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्लीState Governmentराज्य सरकार