शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मोर्चे, आंदोलनांनी जंतर-मंतर पुन्हा गजबजणार, सुप्रीम कोर्टानं बंदी उठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 14:48 IST

राजधानी नवी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलक पुन्हा एकदा आपला आवाज उठवताना दिसणार आहेत.

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलक पुन्हा एकदा आपला आवाज उठवताना दिसणार आहेत. जंतर-मंतर मैदानात आंदोलन करण्यावर लादण्यात आलेली बंदी सुप्रीम कोर्टानं हटवली आहे. दिल्लीमध्ये आंदोलनांवर पूर्णतः बंदी लादली जाऊ शकत नाही असे सांगत सुप्रीम कोर्टानं जंतर-मंतर आणि बोट क्लबवरील आंदोलनासाठी असलेली बंदी हटवण्यात आल्याचा निर्णय दिला. शिवाय, यासंदर्भातील सुनावणीदरम्यान न्यायाधीश ए.के.सिकरी आणि न्यायाधीश अशोक भूषण यांनी दिल्ली पोलिसांना नवीन मार्गदर्शिका तयार करण्यास सांगितले आहे. 

शेतकरी संघटना आणि अन्य संघटनांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना कोर्टानं हा निर्णय दिला आहे. मध्य दिल्लीमध्ये शांततेनं आंदोलन करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांनी केली होती. लादण्यात आलेल्या बंदीमुळे शांततेत आंदोलन करण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले.

याचिकाकर्त्यांनी असेही म्हटले आहे की, ऑक्टोबर 2017 पासून राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतर जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास बंदी लादण्यात आली होती. दुसरीकडे संपूर्ण मध्य दिल्लीमध्ये नेहमीच जमावबंदी लागू असते. यानंतर राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतर 10 ऑक्टोबरपासून पोलिसांनी येथे आंदोलनास परवानगी दिली नाही. हे आमच्या घटनात्मक आणि लोकशाही अधिकारांचे उल्लंघन असल्याचंही याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. 

याचिकाकर्त्यांनी याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाला आव्हान दिले होते. जानेवारी महिन्यात सुप्रीम कोर्टानं या याचिकेवर एमसीडी, दिल्ली पोलीस आणि एनडीएमसीला नोटीस जारी करुन दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले. यावर राष्ट्रीय हरित लवादानं दिल्ली सरकारला जंतर-मंतरवर आंदोलन, सभांच्या आयोजनावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. यावर, राष्ट्रीय हरित लवादानं, रामलीला मैदानात आंदोलन करावे, असे म्हटले होते.

टॅग्स :Jantar Mantarजंतर मंतरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNew Delhiनवी दिल्ली