शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 17:33 IST

भारतरत्न पुरस्काराबाबत दलित व्यक्तींची उपेक्षा करणं अजिबात योग्य नाही, असं मायावती यांनी म्हटलं आहे.

Mayawati On Bharat Ratna Award ( Marathi News ) : केंद्र सरकारकडून कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर आज देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि  पीव्ही नरसिंह राव यांच्यासह ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा करताच देशभरातील विविध राजकीय नेत्यांनी आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत. मात्र या निवडीनंतर नवं वादंगही निर्माण झालं असून उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सरकारकडे नवी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने आणखी तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताच मायावती यांनी म्हटलं आहे की, "केंद्रातील विद्यमान भाजप सरकारकडून ज्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय, त्याबद्दल मी सरकारचं स्वागत करते. मात्र या पुरस्काराबाबत दलित व्यक्तींची उपेक्षा करणं अजिबात योग्य नाही. सरकारने याकडेही लक्ष द्यायला हवं," अशी मागणी मायावती यांनी केली आहे.

भारतरत्न पुरस्कारावरून सरकारला लक्ष्य करताना मायावती पुढे म्हणाल्या की, " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रतिक्षेनंतर व्ही. पी. सिंह यांच्या सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यानंतर दलित आणि उपेक्षितांचे तारणहार श्री कांशीराम यांनी केलेला संघर्षही काही कमी नाही. त्यांनाही लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा," अशी अपेक्षा मायावती यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने भारतरत्न पुरस्काराबाबत आधीचे सर्व विक्रम मोडीत काढत गेल्या १५ दिवसांतच तब्बल पाच  व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. हा सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये २ माजी पंतप्रधान, १ माजी उपपंतप्रधान, १ मुख्यमंत्री तसेच प्रसिद्ध कृषीतज्ज्ञांचा समावेश आहे. यातील चौघांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत आहे. या पाच नावांची घोषणा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

टॅग्स :Bharat Ratnaभारतरत्नNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश