शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

नवीन काँग्रेस अध्यक्षाला असणार मर्यादीत अधिकार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 11:10 IST

काँग्रेस पक्षात इतक्या घडामोडी होत असताना काँग्रेस खरचं गांधी कुटुंबाच्या नियंत्रणातून मुक्त झाली आहे का? राहुल गांधी यांच्याऐवजी काँग्रेस अध्यक्षपद कोणाला दिलं जावं याबाबत पक्षात संभ्रम आहे का?

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरीनंतर पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्षपदाचा राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. मात्र काँग्रेस कार्यकारणीने राहुल यांचा राजीनामा फेटाळून लावला तरी राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम राहिले. त्यामुळे लोकसभा निकालापासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी काम करणारा सक्रीय नेता कोणीच राहिला नाही. अजूनपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवातदेखील झाली नाही. इतकचं नाही तर कर्नाटक, गोवा येथील अनेक काँग्रेस आमदारांनी राजीनामा देत सत्ताधारी पक्षात प्रवेश केले. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. 

काँग्रेस पक्षात इतक्या घडामोडी होत असताना काँग्रेस खरचं गांधी कुटुंबाच्या नियंत्रणातून मुक्त झाली आहे का? राहुल गांधी यांच्याऐवजी काँग्रेस अध्यक्षपद कोणाला दिलं जावं याबाबत पक्षात संभ्रम आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तीन महत्वाच्या घटनांमागे दडली आहेत. पहिली घटना अशी की, ज्या दिवशी राहुल गांधी यांनी राजीनामा परत घेणार नाही अशा आशयाचे चार पानी पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले. त्याच दिवशी राहुल यांच्या सहकाऱ्याने सांगितले की, राहुल यांच्यावर 20 पेक्षा अधिक मानहाणीचे खटले दाखल आहे त्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी मुंबईतील शिवडी कोर्टात आरएसएसने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी उपस्थित राहिले होते. 

दुसरी घटना अशी की, 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले त्यानंतर काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पहिल्यांदा अधिकृतरित्या राजीनामा प्रस्ताव बैठकीत मांडला. मी एकट्याने लढलो असं वक्तव्य करुन पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली तसं इतरांना वाटलं नाही अशी नाराजी व्यक्त केली.  त्यानंतर तिसरी घटना 26 जून रोजी पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत राहुल गांधी यांनी मी पुन्हा दहापटीने कठोर मेहनत करणार असल्याचं सांगितले. त्यावेळी नवीन अध्यक्षपदासाठी शोधमोहीम सुरु होती. त्यामुळे या सगळ्या घटना लक्षात घेतल्या तर आगामी काळात काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा नवीन खांद्यावर दिली तरी लोकांमध्ये काँग्रेसचा चेहरा म्हणून राहुल गांधीच राहतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी