शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
3
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
4
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
5
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
6
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
7
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
8
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
9
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
10
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
11
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
12
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
13
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
14
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
15
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
16
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
17
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
18
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
19
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
20
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

आंदोलनाचे नवे केंद्र गाझीपूर सीमा, शेतकऱ्यांची संख्या चारपट; ५० हजार जण जमले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 07:55 IST

कृषी कायद्यांविराेधात दाेन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाचे मध्यवर्ती केंद्र सिंघू सीमेवर हाेते. आता ती जागा गाझीपूर सीमेने घेतली आहे. दोन दिवसांमध्ये इथल्या शेतकऱ्यांची संख्या चारपटीने वाढली आहे

- विकास झाडेनवी दिल्ली : कृषी कायद्यांविराेधात दाेन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाचे मध्यवर्ती केंद्र सिंघू सीमेवर हाेते. आता ती जागा गाझीपूर सीमेने घेतली आहे. दोन दिवसांमध्ये इथल्या शेतकऱ्यांची संख्या चारपटीने वाढली असून, विविध राजकीय पक्षांचे नेते राकेश टिकैत यांना भेटायला येत आहेत. गाझीपूर सीमेवर आज ५० हजारांवर शेतकरी असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे.२६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलक शेतकऱ्यांबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले होते. आंदोलक ज्या-ज्या सीमेवर बसले आहेत, त्या परिसरातील शेतकरी या आंदोलकांना हटवा म्हणून पोलिसांमध्ये तक्रार करीत आहेत. काही ठिकाणी संधी पाहून दगडफेकही करण्यात येत आहे. या कृती भाजपच्या लोकांकडून घडवून आणल्या जात असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा बोलावू शकते. असे असले, तरी शेतकऱ्यांना आंदोलनात कोणत्याही सुविधा मिळू नयेत, म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. गृहविभागाने सिंघू, गाझीपूर सीमेवरली इंटरनेट सेवा पुन्हा बंद केली आहे.शेतकऱ्यांनी पर्यायांबाबत चर्चा  करावी : पंतप्रधान नरेंद्र मोदीअधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी कायदे आणि शेतकरी आंदाेलनाबाबत सरकारची भूमिका मांडली. सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी. कृषिमंत्री नरेंद्र ताेमर हे शेतकऱ्यांपासून फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत, असे मोदींनी बैठकीत सांगितले.आंदाेलनाची तीव्रता वाढली दोन वर्षांसाठी कायदा स्थगित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने दिला होता. परंतु शेतकऱ्यांनी तो नाकारल्यानंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नाराज होत शेतकऱ्यांसोबत आता पुढची बैठक नाही, असे स्पष्ट केले होते. सोमवारी संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पाश्व�भूमीवर सरकारला बैठक घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही.  सूत्रांनुसार केंद्र सरकार चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा बोलावू शकते. असे असले, तरी शेतकऱ्यांना आंदोलनात कोणत्याही सुविधा मिळू नयेत, म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. गृह विभागाने सिंघू, गाझीपूर सीमेवरील इंटरनेट सेवा पुन्हा बंद केली आहे.पोलिसांच्या कुटुंबीयांचे धरणे !२६ जानेवारीला पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जो संघर्ष झाला, त्यात काही पोलीसही जखमी झालेत. या घटनेचा निषेध म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी शहिदी पार्क येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने या आंदोलकांना सीमेवरून हटवावे, अशीही त्यांनी मागणी केली आहे. राजकीय पक्षांचा  वाढता पाठिंबा!गेल्या दोन दिवसांपासून गाझीपूर सीमेवर विरोधी पक्षातील नेत्यांची गर्दी होत आहे. आज अभय चौटाला पोहोचले. सगळ्यांनीच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासोबत चर्चा करीत आहेत. उद्या संयुक्त किसान मोर्चाची बैठक होत असून, त्यात पुढची रणनीती ठरेल.

टॅग्स :Farmerशेतकरी