शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

तोच शेवटचा प्रवास ठरला! चार मित्रांनी अखेरच्या क्षणी प्लॅन बदलला अन् जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 12:27 IST

चौघांचे वय २३ ते २८ वयोगटातील होते. या चौघांचे मृतदेह गाझीपूरमध्ये आणणार असून त्याठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे. 

गाझीपूर - नेपाळच्या पोखरा भागात झालेल्या प्लेन दुर्घटनेत ७२ लोकांचा मृत्यू झाला. त्या मृतांपैकी ४ युवक उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये राहणारे होते. चौघे नेपाळला फिरण्यासाठी गेले होते. त्यातील सोनू जयस्वालनं विमान दुर्घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच लाईव्ह व्हिडिओ बनवला होता. जो प्लेन दुर्घटनेनंतर समोर आला. सोनूच्या लाईव्ह व्हिडिओत विमान दुर्घटना कैद झाली आहे. 

पोखरा प्लेन दुर्घटनेनंतर गाझीपूरमध्ये शोककळा पसरली आहे. चौघा मित्रांच्या अचानक जाण्यानं प्रत्येकाचे डोळे पाण्याने भरले आहेत. या दुर्घटनेत सोनू जयस्वालसह विशाल शर्मा, अनिल राजभर आणि अभिषेक कुशवाहा यांनी जीव गमावला. चौघांचे वय २३ ते २८ वयोगटातील होते. या चौघांचे मृतदेह गाझीपूरमध्ये आणणार असून त्याठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे. 

या दुर्घटनेने अनेकांना धक्का बसला. त्यातील दिलीप वर्मा, चौघा मित्रांबद्दल दिलीप वर्मा म्हणाले की, त्या चौघांनी पशुपतिनाथ मंदिरातील दर्शनानंतर व्हिडिओ बनवला होता. बसहून पोखराला जाणार म्हटलं. परंतु अचानक कार्यक्रमात बदल झाला आणि सर्वांनी प्लेनचं तिकीट खरेदी केले. हाच प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. नेपाळ प्लेन दुर्घटनेत सर्वाधिक चर्चा २८ वर्षीय सोनू जयस्वालच्या व्हिडिओची होत आहे. दुर्घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच त्याने लाईव्ह व्हिडिओ सुरू केला होता आणि सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. सोनू जयस्वाल बियर शॉप चालवायचा. चौघा भावांमध्ये तो लहान होता आणि घरापासून वेगळे राहत होता. सोनूला २ मुली आणि १ मुलगा आहे. 

या अपघातानंतर सोनूच्या अलवलपूरच्या घरी कोणीही नाही. घराला कुलूप आहे. त्याचा भाऊ नेपाळला रवाना झाला असून आज मृतदेह आणला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. सोनू जयस्वालसोबत विशाल शर्माही गेला होता. मृत्युमुखी पडलेल्या चौघांमध्ये विशाल शर्मा सर्वात लहान आहे.

आजारी आईला मुलगा गेल्याची माहिती नाहीविशाल शर्मा (२३) हा स्थानिक टीव्हीएस बाईक एजन्सीमध्ये बाइक फायनान्स काम करायचा. विशालचे वडील जॉर्जिया (परदेशात) आहेत, लहान भाऊ अजूनही शाळेत आहे आणि आई खूप आजारी आहे. त्यामुळे मुलाच्या मृत्यूची माहिती प्रशासनाने आईला दिलेली नाही. विशाल शर्माच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली, त्यानंतर मृतदेह आणण्यासाठी नातेवाईकच नेपाळला गेले आहेत.

अनिल राजभर असे अपघातात जीव गमावलेल्या तिसऱ्या मित्राचे नाव आहे. २८ वर्षीय अनिलचे गाव चकदरिया चकजैनब आहे. तो शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे अलवलपूर मार्केटमध्येच किराणा दुकान आहे. याशिवाय धारवण गावातील अभिषेक कुशवाह (वय २३ वर्ष) याचाही मृत्यू झाला आहे. अभिषेकचे वडील मून यांना ही बातमी कळताच धक्का बसला. सोनू, अनिल, विशाल आणि अभिषेक सगळे मित्र होते. १२ जानेवारीला अनिल राजभर, विशाल शर्मा आणि अभिषेक कुशवाह एकत्र वाराणसीतील सारनाथला पोहोचले, तेथून सोनू जयस्वालसह काठमांडू, नेपाळला रवाना झाले. सर्व मित्र रविवारी सकाळी काठमांडूहून फ्लाईट घेऊन पोखराला निघाले होते.  

टॅग्स :Nepalनेपाळ