शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

पाक, चीनपाठोपाठ आता नेपाळही भारताचे शत्रुराष्ट्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:43 IST

भारतातील तीन प्रदेशांसह नवा नकाशा केला मंजूर; संसदेत घटनादुरुस्ती विधेयक संमत; तणाव वाढण्याची शक्यता

काठमांडू/नवी दिल्ली : एकीकडे चीन आणि पाकिस्तान भारताच्या सीमेवर कुरापती काढत असतानाच आपला मित्र अडलेल्या नेपाळनेभारताचा काही भाग आपल्या नकाशात समाविष्ट करून टाकला आहे. त्यामुळे दोन देशांत भविष्यात तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. नेपाळने हे पाऊल चीनच्या सांगण्यावरून उचलले की काय, अशीही चर्चा सुरू आहे.भारत-नेपाळ सीमेवरील लिपुलेख, कालापानी व लिंपियाधुरा हे भारताचे सामरिकदृष्टया महत्त्वाचे तीन प्रदेश स्वत:च्या हद्दीत दाखविणाऱ्या नेपाळच्या सुधारित राजकीय नकाशास व या भागांचा नेपाळच्या भूप्रदेशात अंतर्भाव करण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात आली. नेपाळी संसदेच्या प्रतिनिधी सभा या कनिष्ठ सभागृहाने या घटनादुरुस्तीला शनिवारी मंजुरी दिली. पंतप्रधान ओ.पी. ओली यांच्या सरकारने यासाठी मांडलेला ठराव २७२ सदस्यांच्या सभागृहात जवळजवळ एकमताने मंजूर झाला. आता हा ठराव मंजुरीसाठी नेपाळी संसदेच्या नॅशनल अ‍ॅसेंब्ली या वरिष्ठ सभागृहात जाईल. तेथेही मंजुरी मिळाली, तर राष्ट्राध्यक्षांच्या संमतीनंतर नेपाळच्या दृष्टीने या तीन प्रदेशांचा त्यांच्या देशात अधिकृतपणे समावेश होईल.कैलास मानसरोवर यात्रेकरूंसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या लिपुलेख खिंड ते उत्तराखंडमधील धारचुलापर्यंतच्या ८० कि.मी. लांबीच्या पक्क्या रस्त्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मेमध्ये उद्घाटन केले तेव्हा हा रस्ता आपल्या हद्दीतून जात असल्याचा आक्षेप घेऊन नेपाळने आजवर कधीही अस्तित्वात नसलेला सीमावाद सर्वप्रथम उकरून काढला. भारताने नेपाळच्या दाव्याचे ठामपणे खंडन केले.कोरोना महामारीचे संकट हाताळण्यात नेपाळ सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ राजधानी काठमांडूच्या रस्त्यांवर हजारो नेपाळी नागरिक निदर्शने करीत असताना संसदेने हे वादग्रस्त विधेयक मंजूर केले. सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील आपले स्थान व आपले सरकार बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी भावना चेतविण्याचा पंतप्रधान ओली यांचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते.खरे तर हे विधेयक एवढ्या घाईने मंजुरीसाठी घेण्याची काही गरज नव्हती; परंतु पंतप्रधान ओली यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी मुद्दाम सभागृहाची बैठक घेऊन ते मंजूर करून घेतले. यावरून त्यांनी निदान कृतीने तरी चर्चेचे दरवाजे बंद केले आहेत, असे मानले जात आहे. मात्र, या प्रश्नावर आम्ही भारताशी चर्चा करायला तयार आहोत, असे नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)नवा नकाशा कायम; पण चर्चेची तयारीनेपाळचा नकाशा कायम राहील. त्यात बदल होणार नाही. मात्र, चर्चेची दारे उघडी आहेत, असे नेपाळचे पररष्टÑमंत्री प्रदीप ग्यावली यांनी म्हटले आहे. विदेश सचिव स्तरीय चर्चा सुरू करण्याची आमची इच्छा होती. परंतु भारताकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता दोन्ही दूतावास नव्याने अधिकृत चर्चा सुरू करण्याबाबत प्रयत्नशील आहेत.भारताने जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करून नकाशाची फेररचना केली तेव्हा आम्ही आमचा नकाशा बदलण्याचे ठरवले, असेही नेपाळचे परराष्ट्रमंत्री म्हणाले.भारताने दावा फेटाळलाअशा प्रकारे कृत्रिमरीत्या फुगवून केलेला दावा ऐतिहासिक तथ्ये व पुरावे यांना धरून नाही. त्यामुळे टिकणारा नाही. न सुटलेला सीमेविषयीचा वाद चर्चेने सोडवण्याच्या दोन्ही देशांमधील सहमतीलाही तो धरून नाही.- अनुराग श्रीवास्तव, प्रवक्ते, भारताचे परराष्ट्र मंत्रालय

टॅग्स :IndiaभारतNepalनेपाळPakistanपाकिस्तानchinaचीन