शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नदी मन जोडते! महाकाली नदीचा प्रवाह बदलणार नाही, भारत-नेपाळमधील बैठकीत सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:40 IST

नेपाळ आणि भारताने बुधवारी महाकाली नदीला मूळ प्रवाहात वाहू देण्याचे मान्य केलं आहे.

नेपाळ आणि भारताने बुधवारी महाकाली नदीला मूळ प्रवाहात वाहू देण्याचे मान्य केलं आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारताच्या पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथे नेपाळ-भारत सीमेवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि जिथे दोन्ही बाजूंनी तात्पुरता बंधारा काढून नदीला नैसर्गिक मार्गावर वाहू देण्यावर सहमती दर्शविली गेली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी भारतानं महाकाली नदीचा प्रवाह वळवण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधल्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला होता.

धारचुला दीरघचे मुख्य जिल्हा अधिकारी राज उपाध्याय यांनी सांगितले की, बुधवारी दोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेपाळने केलेल्या विनंतीनुसार १० दिवसांच्या आत तात्पुरत्या तटबंदीचा ढिगारा हटवण्याचे भारतानं मान्य केलं आहे. महाकाली नदी उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथे भारत आणि नेपाळ दरम्यान वाहते. या नदीवर भारतानं बांधलेल्या सुरक्षा भिंतीमुळे नदीचे पाणी नेपाळकडे वळवल्यानं पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नेपाळमध्ये निर्माण झाली होती.

नेपाळचं भारताला पत्रधारचुलामध्ये बुधवारी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नेपाळी अधिकारी दिर्घराज उपाध्याय उपस्थित होते. "आम्ही डेब्रिज हटवण्याच्या कामासाठी निविदा मागवल्या आहेत. १० दिवसांत ढिगारा हटवण्याची प्रक्रिया सुरू होईल", अशी माहिती उपाध्याय यांनी दिली. तळबंधाच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादानंतर नेपाळने मंगळवारी भारताला पत्र पाठवलं होतं. 

नेपाळी आणि भारतीय लोकांमध्ये संघर्षदोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान, नेपाळच्या विनंतीनुसार भारतीय अधिकाऱ्यांनी १० दिवसांच्या आत बांधकाम हटविण्याचं मान्य केलं. धारचुलाचे मुख्य जिल्हा अधिकारी दीर्घराज उपाध्याय यांनी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितलं की, भारतीय अधिकाऱ्यांनी तटबंदी क्षेत्राची पाहणी केली आहे. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेपाळचे प्रतिनिधित्व धीरघराज उपाध्याय, सशस्त्र पोलिस दल धारचुलाचे डुंबर बिश्त, नेपाळ पोलिसांचे तारकराज पांडे आणि महाकाली नदी नियंत्रण प्रकल्पाचे कार्यवाहक प्रमुख करण सिंह धामी यांनी केलं. या काळात डीएम रीना जोशी आणि एसडीएम दिवेश मुन्नी यांनी भारतीय बाजूचं प्रतिनिधित्व केलं. यापूर्वी धारचुलामध्ये नेपाळी आणि भारतीय लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली होती. यामध्ये एका नागरिकासह चार नेपाळी जखमी झाले.