शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

नदी मन जोडते! महाकाली नदीचा प्रवाह बदलणार नाही, भारत-नेपाळमधील बैठकीत सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:40 IST

नेपाळ आणि भारताने बुधवारी महाकाली नदीला मूळ प्रवाहात वाहू देण्याचे मान्य केलं आहे.

नेपाळ आणि भारताने बुधवारी महाकाली नदीला मूळ प्रवाहात वाहू देण्याचे मान्य केलं आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारताच्या पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथे नेपाळ-भारत सीमेवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि जिथे दोन्ही बाजूंनी तात्पुरता बंधारा काढून नदीला नैसर्गिक मार्गावर वाहू देण्यावर सहमती दर्शविली गेली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी भारतानं महाकाली नदीचा प्रवाह वळवण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधल्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला होता.

धारचुला दीरघचे मुख्य जिल्हा अधिकारी राज उपाध्याय यांनी सांगितले की, बुधवारी दोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेपाळने केलेल्या विनंतीनुसार १० दिवसांच्या आत तात्पुरत्या तटबंदीचा ढिगारा हटवण्याचे भारतानं मान्य केलं आहे. महाकाली नदी उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथे भारत आणि नेपाळ दरम्यान वाहते. या नदीवर भारतानं बांधलेल्या सुरक्षा भिंतीमुळे नदीचे पाणी नेपाळकडे वळवल्यानं पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नेपाळमध्ये निर्माण झाली होती.

नेपाळचं भारताला पत्रधारचुलामध्ये बुधवारी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नेपाळी अधिकारी दिर्घराज उपाध्याय उपस्थित होते. "आम्ही डेब्रिज हटवण्याच्या कामासाठी निविदा मागवल्या आहेत. १० दिवसांत ढिगारा हटवण्याची प्रक्रिया सुरू होईल", अशी माहिती उपाध्याय यांनी दिली. तळबंधाच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादानंतर नेपाळने मंगळवारी भारताला पत्र पाठवलं होतं. 

नेपाळी आणि भारतीय लोकांमध्ये संघर्षदोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान, नेपाळच्या विनंतीनुसार भारतीय अधिकाऱ्यांनी १० दिवसांच्या आत बांधकाम हटविण्याचं मान्य केलं. धारचुलाचे मुख्य जिल्हा अधिकारी दीर्घराज उपाध्याय यांनी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितलं की, भारतीय अधिकाऱ्यांनी तटबंदी क्षेत्राची पाहणी केली आहे. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेपाळचे प्रतिनिधित्व धीरघराज उपाध्याय, सशस्त्र पोलिस दल धारचुलाचे डुंबर बिश्त, नेपाळ पोलिसांचे तारकराज पांडे आणि महाकाली नदी नियंत्रण प्रकल्पाचे कार्यवाहक प्रमुख करण सिंह धामी यांनी केलं. या काळात डीएम रीना जोशी आणि एसडीएम दिवेश मुन्नी यांनी भारतीय बाजूचं प्रतिनिधित्व केलं. यापूर्वी धारचुलामध्ये नेपाळी आणि भारतीय लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली होती. यामध्ये एका नागरिकासह चार नेपाळी जखमी झाले.