शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

नदी मन जोडते! महाकाली नदीचा प्रवाह बदलणार नाही, भारत-नेपाळमधील बैठकीत सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:40 IST

नेपाळ आणि भारताने बुधवारी महाकाली नदीला मूळ प्रवाहात वाहू देण्याचे मान्य केलं आहे.

नेपाळ आणि भारताने बुधवारी महाकाली नदीला मूळ प्रवाहात वाहू देण्याचे मान्य केलं आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारताच्या पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथे नेपाळ-भारत सीमेवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि जिथे दोन्ही बाजूंनी तात्पुरता बंधारा काढून नदीला नैसर्गिक मार्गावर वाहू देण्यावर सहमती दर्शविली गेली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी भारतानं महाकाली नदीचा प्रवाह वळवण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधल्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला होता.

धारचुला दीरघचे मुख्य जिल्हा अधिकारी राज उपाध्याय यांनी सांगितले की, बुधवारी दोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेपाळने केलेल्या विनंतीनुसार १० दिवसांच्या आत तात्पुरत्या तटबंदीचा ढिगारा हटवण्याचे भारतानं मान्य केलं आहे. महाकाली नदी उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथे भारत आणि नेपाळ दरम्यान वाहते. या नदीवर भारतानं बांधलेल्या सुरक्षा भिंतीमुळे नदीचे पाणी नेपाळकडे वळवल्यानं पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नेपाळमध्ये निर्माण झाली होती.

नेपाळचं भारताला पत्रधारचुलामध्ये बुधवारी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नेपाळी अधिकारी दिर्घराज उपाध्याय उपस्थित होते. "आम्ही डेब्रिज हटवण्याच्या कामासाठी निविदा मागवल्या आहेत. १० दिवसांत ढिगारा हटवण्याची प्रक्रिया सुरू होईल", अशी माहिती उपाध्याय यांनी दिली. तळबंधाच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादानंतर नेपाळने मंगळवारी भारताला पत्र पाठवलं होतं. 

नेपाळी आणि भारतीय लोकांमध्ये संघर्षदोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान, नेपाळच्या विनंतीनुसार भारतीय अधिकाऱ्यांनी १० दिवसांच्या आत बांधकाम हटविण्याचं मान्य केलं. धारचुलाचे मुख्य जिल्हा अधिकारी दीर्घराज उपाध्याय यांनी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितलं की, भारतीय अधिकाऱ्यांनी तटबंदी क्षेत्राची पाहणी केली आहे. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेपाळचे प्रतिनिधित्व धीरघराज उपाध्याय, सशस्त्र पोलिस दल धारचुलाचे डुंबर बिश्त, नेपाळ पोलिसांचे तारकराज पांडे आणि महाकाली नदी नियंत्रण प्रकल्पाचे कार्यवाहक प्रमुख करण सिंह धामी यांनी केलं. या काळात डीएम रीना जोशी आणि एसडीएम दिवेश मुन्नी यांनी भारतीय बाजूचं प्रतिनिधित्व केलं. यापूर्वी धारचुलामध्ये नेपाळी आणि भारतीय लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली होती. यामध्ये एका नागरिकासह चार नेपाळी जखमी झाले.