शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ना पुतिन...ना ट्रम्प..; भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'या' दोन पाहुण्यांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:40 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी विविध देशांच्या प्रमुखांना बोलावले जाते.

नवी दिल्ली : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी विविध देशांच्या प्रमुखांना निमंत्रण दिले जाते. मात्र, 2026 च्या प्रजासत्ताक दिनासाठी सरकारने कुठल्याही देशांच्या प्रमुखांना नाही, तर युरोपियन युनियनच्या (EU) दोन सर्वोच्च नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. यात युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांचा समावेश आहे.

हे पहिल्यांदाच होत आहे, जेव्हा भारत सरकार प्रजासत्ताक दिनामित्त कुठल्याही देशांच्या प्रमुखांव्यतिरिक्त एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दोन सर्वोच्च नेत्यांना आमंत्रित करत आहे. हा निर्णय भारत आणि युरोपियन युनियनमधील वाढत्या रणनीतिक, आर्थिक आणि राजनैतिक भागीदारीचे प्रतीक मानले जात आहे.

औपचारिक घोषणा लवकरच

भारताकडून प्रजासत्ताक दिनामित्त परदेशी नेत्यांना आमंत्रित करणे ही केवळ औपचारिकता नसून, देशाच्या परराष्ट्र धोरणातील एक रणनीतिक संकेत असतो.प्रत्येक निमंत्रित नेता भारताच्या भू-राजनैतिक आणि आर्थिक प्राधान्यांचे प्रतीक असते. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, नवी दिल्ली आणि ब्रुसेल्स यांच्यात यासंदर्भात अंतिम चर्चा सुरू असून, औपचारिक निमंत्रण आणि स्वीकृतीची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. 

2025 मध्ये कोण होते प्रमुख पाहुणे?

2025 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक सोहळ्याला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियान्तो प्रमुख अतिथी होते. आता 2026 मध्ये युरोपियन युनियनच्या या दोन नेत्यांचे आगमन होणार असल्याने भारताच्या कूटनीतिक इतिहासात एक नवे पान लिहिले जाईल.

भारत-युरोपियन युनियन संबंधांमध्ये नवे बळ

अलीकडच्या काही महिन्यांत भारत आणि 27 सदस्यीय युरोपियन युनियन यांच्यातील संबंधात लक्षणीय प्रगती झाली आहे. फेब्रुवारीत युरोपियन आयोगाच्या प्रतिनिधींच्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही बाजूंमधील संवाद आणि सहकार्य आणखी गतीमान झाले. 20 ऑक्टोबर रोजी युरोपियन युनियनने ‘नवीन रणनीतिक अजेंडा’ मंजूर केला, ज्यामध्ये भारत-ईयू संबंधांना नवीन उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. या अजेंड्यात मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम करणे, तसेच तंत्रज्ञान, संरक्षण, सुरक्षा आणि जनसंपर्क क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : EU Leaders Invited for India's 2026 Republic Day

Web Summary : India invites EU leaders for the 2026 Republic Day celebration, marking strengthened strategic ties. Ursula von der Leyen and António Costa will attend, signaling a new phase in India-EU relations focusing on trade, technology, and defense cooperation. This is a departure from inviting national leaders.
टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४Indiaभारतdelhiदिल्ली