शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

स्वातंत्र्यासाठी नेहरु, सुभाषचंद्र बोस फासावर चढले, जावडेकरांनी बदलला इतिहास

By admin | Updated: August 23, 2016 14:29 IST

भारताच्या स्वातंत्र्यढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बोलताना सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि पंडीत जवाहरलाल नेहरुंचा प्रकाश जावडेकरांनी शहीद म्हणून उल्लेख केला

- ऑनलाइन लोकमत 
भोपाळ, दि. 23 - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वातंत्र्यावर बोलताना इतिहासच बदलून टाकला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बोलताना नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरुंचा प्रकाश जावडेकरांनी शहीद म्हणून उल्लेख केला. जावडेकर एवढ्यावरच थांबले नाही तर ते फासावर चढले होते असंही म्हणाले आहेत. 
 
मध्यप्रदेशमधील छिंदवारा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत प्रकाश जावडेकर बोलत होते. 'स्वातंत्र्यासाठी 1857 मध्ये लढ्याला सुरुवात झाली. 90 वर्षांनी लढा संपला आणि आपण ब्रिटिशांना देशातून बाहेर काढलं. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु, भगत सिंग आणि राजगुरु यांच्यासहित ते सर्व जे फासावर चढले, त्या सर्व शहिदांना मी सलाम करतो', असं वक्तव्य प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. 
 
प्रकाश जावडेकर यांनी सुभाषचंद्र बोस यांनादेखील शहिदांच्या यादीत टाकून दिलं. विशेष म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ अजून कायम असून सरकारने या विषयावर मौन बाळगलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत की मृत याची सरकारने कोणतीच अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. 
 
प्रकाश जावडेकर या तिरंगा यात्रेत स्कुटी चालवत सहभागी झाले होते. नियमाचं पालन करत त्यांनी हेल्मेट घातलं होतं. मात्र मोठ्या संख्येने जमा झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. अनेकांनी विना हेल्मेट दुचाकी चालवली होती.