शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

नेहरूंनी 8, इंदिरा गांधींनी 50, राजीव यांनी 9, तर...! का आणण्यात आलं 'एक देश एक निवडणूक' विधेयक? भाजपनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:13 IST

गत काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केल्याचा इतिहास पाहता, सरकारने 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यसभेतील नेते तथा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.

 

'एक देश एक निवडणूक' अर्थात 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक आज (मंगळवार) लोकसभेत सादर करण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. यानंतर, काँग्रेससह विरोधी बाकावरील अनेक पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, गत काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केल्याचा इतिहास पाहता, सरकारने 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यसभेतील नेते तथा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.

भारतीय संविधानाच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासासंदर्भात राज्यसभेत सुरू असलेली चर्चा दुसऱ्या दिवशी पुढे घेऊन जाताना नड्डा यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. नड्डा म्हणाले, "आज आपण 'एक देश, एक निवडणूक'च्या विरोधात उभे आहात. खरे तर, आपल्यामुळेच 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणावे लागले. कारण 1952 ते 1967 या काळात देशात एकाच वेळी निवडणुका होत होत्या. कलम 356 चा वापर करून तुम्ही (काँग्रेस) वारंवार राज्यांतील निवडून आलेली सरकारं पाडली आणि असे करून त्या राज्यांत स्वतंत्र निवडणुकांची परिस्थिती निर्माण केली."

काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा  90 वेळा वापर केला -भाजपाध्यक्ष नड्डा पुढे म्हणाले, काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा  90 वेळा वापर केला. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356चा 8 वेळा, इंदिरा गांधींनी 50 वेळा, राजीव गांधींनी 9 वेळा, तर मनमोहन सिंग यांनी 10 वेळा कलम 356चा  गैरवापर केला. एवढेच नाही तर, 'राज्यघटनेच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासात या गोष्टींचा उल्लेख व्हायला हवा, (लोकांन) माहीत व्हायला हवे की, तुम्ही निवडून आलेल्या सरकारांना एकदा नव्हे तर वारंवार कशा पद्धतीने पाडले आणि देशाला अडचणीत आणले.

आणीबाणीचा उल्लेख करत नड्डा म्हणाले, "देशावर काही संकट आले होते का की देशावर आणीबाणी थोपवली गेली? नाही... देशाला कसलाही धोका नव्हता, खुर्चीला धोका होता. किस्सा खुर्चीचा होता. जिच्यासाठी संपूर्ण देशाला अंधकारात ढकलण्यात आले."

तुम्हाला वेळेपूर्वी सांगतो की, तुम्ही 25 जून 2025 रोजी लोकशाही विरोधी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा" -नड्डा म्हणाले, "काँग्रेसचे सदस्यं म्हणतात की, त्यांच्या नेत्याने आणीबाणीची चूक मान्य केली आहे, त्यामुळे याचा वारंवार उल्लेख केला जाऊ नये. पण, आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. आपल्या मनात जर प्रायश्चित्ताची जराही भावना असे, तर मी आवाहन करतो… आणि तुम्हाला वेळेपूर्वी सांगतो की, तुम्ही 25 जून 2025 रोजी लोकशाही विरोधी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा." 

उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी सरकारने 25 जून हा 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषित केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 पर्यंत आणीबाणी लादली होती.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाPoliticsराजकारण