शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

नेहरूंनी 8, इंदिरा गांधींनी 50, राजीव यांनी 9, तर...! का आणण्यात आलं 'एक देश एक निवडणूक' विधेयक? भाजपनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:13 IST

गत काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केल्याचा इतिहास पाहता, सरकारने 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यसभेतील नेते तथा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.

 

'एक देश एक निवडणूक' अर्थात 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक आज (मंगळवार) लोकसभेत सादर करण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. यानंतर, काँग्रेससह विरोधी बाकावरील अनेक पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, गत काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केल्याचा इतिहास पाहता, सरकारने 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यसभेतील नेते तथा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.

भारतीय संविधानाच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासासंदर्भात राज्यसभेत सुरू असलेली चर्चा दुसऱ्या दिवशी पुढे घेऊन जाताना नड्डा यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. नड्डा म्हणाले, "आज आपण 'एक देश, एक निवडणूक'च्या विरोधात उभे आहात. खरे तर, आपल्यामुळेच 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणावे लागले. कारण 1952 ते 1967 या काळात देशात एकाच वेळी निवडणुका होत होत्या. कलम 356 चा वापर करून तुम्ही (काँग्रेस) वारंवार राज्यांतील निवडून आलेली सरकारं पाडली आणि असे करून त्या राज्यांत स्वतंत्र निवडणुकांची परिस्थिती निर्माण केली."

काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा  90 वेळा वापर केला -भाजपाध्यक्ष नड्डा पुढे म्हणाले, काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा  90 वेळा वापर केला. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356चा 8 वेळा, इंदिरा गांधींनी 50 वेळा, राजीव गांधींनी 9 वेळा, तर मनमोहन सिंग यांनी 10 वेळा कलम 356चा  गैरवापर केला. एवढेच नाही तर, 'राज्यघटनेच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासात या गोष्टींचा उल्लेख व्हायला हवा, (लोकांन) माहीत व्हायला हवे की, तुम्ही निवडून आलेल्या सरकारांना एकदा नव्हे तर वारंवार कशा पद्धतीने पाडले आणि देशाला अडचणीत आणले.

आणीबाणीचा उल्लेख करत नड्डा म्हणाले, "देशावर काही संकट आले होते का की देशावर आणीबाणी थोपवली गेली? नाही... देशाला कसलाही धोका नव्हता, खुर्चीला धोका होता. किस्सा खुर्चीचा होता. जिच्यासाठी संपूर्ण देशाला अंधकारात ढकलण्यात आले."

तुम्हाला वेळेपूर्वी सांगतो की, तुम्ही 25 जून 2025 रोजी लोकशाही विरोधी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा" -नड्डा म्हणाले, "काँग्रेसचे सदस्यं म्हणतात की, त्यांच्या नेत्याने आणीबाणीची चूक मान्य केली आहे, त्यामुळे याचा वारंवार उल्लेख केला जाऊ नये. पण, आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. आपल्या मनात जर प्रायश्चित्ताची जराही भावना असे, तर मी आवाहन करतो… आणि तुम्हाला वेळेपूर्वी सांगतो की, तुम्ही 25 जून 2025 रोजी लोकशाही विरोधी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा." 

उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी सरकारने 25 जून हा 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषित केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 पर्यंत आणीबाणी लादली होती.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाPoliticsराजकारण