शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नीट परीक्षा ही श्रीमंतांसाठीच, ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटले; राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 06:59 IST

नीट परीक्षा ही आता फॅशन झाली असून, तुम्ही नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा करून टाकले आहे.

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधींनी नीट-यूजी परीक्षेवरून केंद्र सरकारला घेरले. सरकारने नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा बनविले असून, सरकार पेपरफुटी थांबवू शकलेले नाही. गेल्या ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्ही दोन हजार पूर्वीच्या गोष्टी करता, मात्र आता आपण थोडी भारताच्या भविष्याबद्दलही चर्चा करायला हवी. तुम्ही रोजगार याअगोदरच संपविले असून, नोटबंदी आणि जीएसटीने लहान उद्योजक संपले आहेत. तरुणांना सैन्यात नोकरी मिळत होती, मात्र आता अग्निवीर योजना आणली गेली आहे. त्यामुळे नोकरीचा तो मार्गही तरुणांसाठी बंद झाला आहे.

नीट परीक्षा ही आता फॅशननीट परीक्षा ही आता फॅशन झाली असून, तुम्ही नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा करून टाकले आहे. नीट परीक्षेत एखादा विद्यार्थी टॉपर असू शकतो, मात्र जर त्याच्याकडे पैसे नसतील तर तो वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. नीट परीक्षा ही केवळ श्रीमंतांच्या मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. कोटामध्ये व्यावसायिक क्लासेस सुरू करून या परीक्षेचे केंद्रीकरण करण्यात आले आहे. तेथे हजारो, कोट्यवधी रुपये तयार केले जात आहेत, असे राहुल म्हणाले.

...तर आम्ही सरकारसोबत राहूआजच्या काळात व्यावसायिक शिक्षण इतके महाग झाले आहे की गरीब कुटुंबातील मुलगा त्यात शिकू शकत नाही. विद्यार्थी ६ महिने, वर्षभर नीट परीक्षेची तयारी करतात. नीटच्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेवर विश्वास राहिलेला नाही. नीट परीक्षेवर मार्ग काढण्यासाठी पूर्ण एक दिवस चर्चा व्हावी. आम्ही यातून मार्ग काढण्यासाठी सरकारसोबत राहू. नीट परीक्षेचे पेपर लीक होणे हे मोठे अपयश आहे. त्यामुळे यावर चर्चेतून मार्ग काढण्याची गरज आहे. मात्र सरकारला यावर  कोणतीही चर्चा करायची नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

देशामध्ये विविध परीक्षा होत असतात. या परीक्षांबाबत विशेषत: नीट-यूजी, नीट-पीजीबद्दल अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या त्रुटींवर तातडीने योग्य तोडगा काढणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये परीक्षांत घडलेले गैरप्रकार, सरकारी नोकऱ्यांच्या भरतीतील भ्रष्टाचार या गोष्टी अतिशय गंभीर व चिंता वाटण्याजोग्या आहेत. लोकांमध्ये अस्वस्थता, चिंता आणि संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणात कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटण्याचे व अन्य गैरप्रकार समोर आल्यामुळे नीट-यूजी परीक्षा वादग्रस्त ठरली आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी अनेक जणांनी केली आहे.- मायावती, प्रमुख, बसप

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी