शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

नीट परीक्षा ही श्रीमंतांसाठीच, ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटले; राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 06:59 IST

नीट परीक्षा ही आता फॅशन झाली असून, तुम्ही नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा करून टाकले आहे.

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधींनी नीट-यूजी परीक्षेवरून केंद्र सरकारला घेरले. सरकारने नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा बनविले असून, सरकार पेपरफुटी थांबवू शकलेले नाही. गेल्या ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्ही दोन हजार पूर्वीच्या गोष्टी करता, मात्र आता आपण थोडी भारताच्या भविष्याबद्दलही चर्चा करायला हवी. तुम्ही रोजगार याअगोदरच संपविले असून, नोटबंदी आणि जीएसटीने लहान उद्योजक संपले आहेत. तरुणांना सैन्यात नोकरी मिळत होती, मात्र आता अग्निवीर योजना आणली गेली आहे. त्यामुळे नोकरीचा तो मार्गही तरुणांसाठी बंद झाला आहे.

नीट परीक्षा ही आता फॅशननीट परीक्षा ही आता फॅशन झाली असून, तुम्ही नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा करून टाकले आहे. नीट परीक्षेत एखादा विद्यार्थी टॉपर असू शकतो, मात्र जर त्याच्याकडे पैसे नसतील तर तो वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. नीट परीक्षा ही केवळ श्रीमंतांच्या मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. कोटामध्ये व्यावसायिक क्लासेस सुरू करून या परीक्षेचे केंद्रीकरण करण्यात आले आहे. तेथे हजारो, कोट्यवधी रुपये तयार केले जात आहेत, असे राहुल म्हणाले.

...तर आम्ही सरकारसोबत राहूआजच्या काळात व्यावसायिक शिक्षण इतके महाग झाले आहे की गरीब कुटुंबातील मुलगा त्यात शिकू शकत नाही. विद्यार्थी ६ महिने, वर्षभर नीट परीक्षेची तयारी करतात. नीटच्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेवर विश्वास राहिलेला नाही. नीट परीक्षेवर मार्ग काढण्यासाठी पूर्ण एक दिवस चर्चा व्हावी. आम्ही यातून मार्ग काढण्यासाठी सरकारसोबत राहू. नीट परीक्षेचे पेपर लीक होणे हे मोठे अपयश आहे. त्यामुळे यावर चर्चेतून मार्ग काढण्याची गरज आहे. मात्र सरकारला यावर  कोणतीही चर्चा करायची नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

देशामध्ये विविध परीक्षा होत असतात. या परीक्षांबाबत विशेषत: नीट-यूजी, नीट-पीजीबद्दल अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या त्रुटींवर तातडीने योग्य तोडगा काढणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये परीक्षांत घडलेले गैरप्रकार, सरकारी नोकऱ्यांच्या भरतीतील भ्रष्टाचार या गोष्टी अतिशय गंभीर व चिंता वाटण्याजोग्या आहेत. लोकांमध्ये अस्वस्थता, चिंता आणि संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणात कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटण्याचे व अन्य गैरप्रकार समोर आल्यामुळे नीट-यूजी परीक्षा वादग्रस्त ठरली आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी अनेक जणांनी केली आहे.- मायावती, प्रमुख, बसप

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी