शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:06 IST

कृष्णकुमार धाकड याने त्याच्या चहाच्या टपरीचं नाव आयपीसीच्या कलम ४९८अ वरून "४९८अ टी कॅफे" असं ठेवलं आहे.

मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील अठाना परिसरातील रहिवासी कृष्णकुमार धाकड हा त्याची यूपीएससीची तयारी सोडून राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील अंता येथे चहाची टपरी चालवत आहे. या दुकानाचा उद्देश केवळ चहा विकणे किंवा पैसे कमवणे नाही, तर त्यामागे धाकड याच्या आयुष्यात घडलेली एक धक्कादायक घटना आहे, ज्यामुळे त्याला असं मोठं पाऊल उचलावं लागलं.

कृष्णकुमार धाकड याने त्याच्या चहाच्या टपरीचं नाव आयपीसीच्या कलम ४९८अ वरून "४९८अ टी कॅफे" असं ठेवलं आहे. त्याने चहाच्या दुकानावरील बॅनर आणि होर्डिंग्जवर घोषणा लिहिल्या आहेत आणि न्यायाची मागणी केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, 'न्याय मिळेपर्यंत चहा उकळत राहील'. चला चहावर चर्चा करूया... असंही म्हटलं आहे. पत्नीने छळ आणि हुंड्याच्या खोट्या प्रकरणात अडकवल्यामुळे त्याने न्याय मागितला आहे.

नीमच जिल्ह्यातील जावद तहसीलच्या अठाना नगर येथील रहिवासी केके धाकड याच जुलै २०१८ मध्ये राजस्थानमधील अंता येथील एका मुलीशी लग्न झालं होतं. २०१९ मध्ये केके धाकड याने पत्नी अंता यांच्याकडून मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेतलं. दोघांनीही अठाना परिसरातूनच मधमाशी पालन सुरू केलं. त्यानंतर व्यवसाय हळूहळू वाढू लागला. धाकड आणि त्यांच्या पत्नीने महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बेरोजगार महिलांना रोजगार देण्यास सुरुवात केली.

८ एप्रिल २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात पहिल्यांदाच महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या कार्याचं कौतुक केलं. सुमारे १ वर्षात मधमाशी पालन व्यवसायाला इतकी गती मिळाली की दूरवर मधाची मागणी वाढली, परंतु २०२२ मध्ये कृष्णकुमार धाकड याच्या आयुष्यात एक वळण आलं, जिथून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. 

ऑक्टोबर २०२२ मध्ये  पत्नी अचानक नाराज झाली आणि तिच्या माहेरी गेली. त्यानंतर मधाचा व्यवसाय ठप्प झाला. काही महिन्यांनंतर केकेच्या पत्नीने घरगुती हिंसाचार आणि हुंड्याचा छळ केल्याबद्दल आयपीसीच्या कलम ४९८अ आणि पोटगीच्या कलम १२५ अंतर्गत न्यायालयात खटला दाखल केला. धाकडने एक अनोखं पाऊल उचललं आणि त्यांच्या सासरच्या घरासमोरच ४९८अ  नावाने चहाची टपरी सुरू केली.

गेल्या ३ वर्षांपासून मी एका खोट्या प्रकरणात अडकलो आहे आणि न्यायासाठी राजस्थानातील अंता जिल्ह्यात दारोदारी भटकत आहे. माझी एक आई वृद्ध आहे, जिचा मी एकमेव आधार आहे. सर्व काही उद्ध्वस्त झाल्यानंतर मला एका शेडमध्ये राहावे लागते. मला केवळ मानसिकच नाही तर सामाजिक छळालाही तोंड द्यावं लागत आहे. अनेक वेळा मी आत्महत्या करण्याचा विचार केला, पण नंतर मला माझ्या आईची आठवण येते. आता  मी '४९८अ टी कॅफे'च्या नावाखाली चहा विकून कायद्याशी लढत राहीन असं कृष्णकुमार धाकड याने म्हटलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशdowryहुंडाCrime Newsगुन्हेगारी