शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

एकदा पाकिस्तानसोबत आरपारची लढाई झालीच पाहिजे - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 13:48 IST

पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शस्त्रसंधी उल्लंघनावर बोलताना आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी एकदा तरी पाकिस्तानसोबत आरपार लढाई झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शस्त्रसंधी उल्लंघनावर बोलताना आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी एकदा तरी पाकिस्तानसोबत आरपार लढाई झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तानी लष्कराने राजौरी व पूंछ जिल्ह्यात केलेल्या गोळीबारात चार जवानांना वीरमरण आल्याच्या वृत्ताने देशभर संतापाची लाट उसळली असून, पाकला आता जोरदार अद्दल घडवा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. पाकिस्तान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असताना भारताने गप्प न बसता, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेकी व पाक सैनिक यांचे अड्डे व बंकर्स संपवून टाकावेत, अशी चर्चा सामान्यांमध्येही सुरू होती. सोमवारी बीएसएफचा एक अधिकारीही पाकच्या हल्ल्यात जखमी झाला.

'मला वाटतं पाकिस्तानसोबत एकदा आरपार लढाई झाली पाहिजे. आम्ही मैत्री करण्यास इच्छुक आहोत. पण एकदा पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे', असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. 

पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे सीमा रेषा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील २४ गावे पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहेत, तसेच ८४ शाळाही ३ दिवसांपासून बंद आहेत. हल्ल्याच्या भीतीने लोकांचे स्थलांतर सुरू असून, पाकला त्यांच्या घरात घुसून संपवा, अशी मागणी स्थानिकही करीत आहेत. आतापर्यंत ९0 स्थानिक पाकच्या गोळीबारात जखमी झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि भारतीय सैन्यदलाचे उपप्रमुख ले. जनरल शरत चंद यांनी आम्ही गप्प बसणार नाही आणि पाकला धडा शिकवू, असा इशारा दिला आहे. ले. जनरल शरत चंद म्हणाले की, भारतीय सैन्य पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. बदला न सांगता घेतला जात असतो. आम्ही अधिक बोलणार नाही. आमची कारवाईच काय ते बोलेल. अतिरेक्यांच्या घुसखोरीला पाकिस्तानी सैन्याची फूस असल्याचे सांगून, ते म्हणाले की, पाकिस्तानला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत, ‘भारतीय सैन्याच्या शौर्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.’

जवानांचे पार्थिव घरीपाकिस्तानने काल केलेल्या हल्ल्यात जे जवान शहीद झाले, त्यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या घरी पाठविण्यात आले. २ जवान काश्मीरच्या कठुआ व सांबा येथील होते, तर १ जवान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा होता. कॅप्टन कपिल कुंडू यांचे पार्थिव दिल्लीला आणून तेथून गुरगावला नेण्यात आले. दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन व लष्करप्रमुखांनी विमानतळावर पार्थिवाचे दर्शन घेतले व त्यांना आदरांजली वाहिली. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPakistanपाकिस्तान