शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींचे विचार न अंगीकारल्याने आत्मनिर्भर भारत मोहिमेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 02:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी; कोरोना संकटात शेतकरी डगमगला नाही

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांचे अर्थव्यवस्थेसंदर्भातील विचार आचरणात आणले असते, तर आत्मनिर्भर भारत ही मोहीम राबविण्याची गरजच निर्माण झाली नसती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘मन की बात’द्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला.

ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत निर्माण होण्यासाठी शेती व शेतकरी हे दोन घटक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. काही वर्षांपूर्वी काही राज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्याच्या कक्षेतून फळे, भाज्या यांना मुक्त केल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा झाला. कोरोना काळात शेतकऱ्यांनी अत्यंत धीरोदात्तपणे संकटाचा सामना केला. ते म्हणाले की, कृषीविषयक महत्त्वाची विधेयके संसदेत नुकतीच मंजूर झाली ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.या विधेयकांतील तरतुदींमुळे शेतकºयांना पिकविलेले अन्नधान्य कोणाला विकायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. भारतीय सैन्याने २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानच्या हद्दीत सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळ उद््ध्वस्त केले होते. या घटनेला यावर्षी २९ सप्टेंबरला चार वर्षे पूर्ण होत आहेत. मातृभूमीच्या रक्षणासाठी भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईकची मोलाची कामगिरी बजावली होती, असे मोदी म्हणाले.गोष्टींच्या माध्यमातून कुटुंबाला जोडता येईलच्मोदी यांनी सांगितले की, कथाकथन ही एक उत्तम कला आहे. कोरोना साथीमुळे कुटुंबातील बहुतेक लोक घरात थांबल्यामुळे त्याचा एक फायदा असा झाला की, हे लोक परस्परांना वेळ देऊ शकले.च्मात्र, काही कुटुंबांमधील लोक आपली मूल्ये विसरत चालले आहेत. त्यांना गोष्टी सांगण्याच्या कलेच्या माध्यमातून परस्परांच्या जवळ आणता येईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या