शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक, रामदेवबाबांच्या वक्तव्याला गिरिराज सिंहांचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 1:37 PM

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र...

बेगुसराय - लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही आहे. बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा खासदार गिरिराज सिंह यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत योगगुरू रामदेब बाबा यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.  तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक असल्याचेही गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे. तिसऱ्या अपत्याला मताधिकार आणि सरकारी नोकऱ्यांपासून वंचित करण्यात यावे, असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला होता. दरम्यान, गिरिराज सिंह यांनी रामदेव बाबांच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ''रामदेव बाबांच्या वक्तव्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे. तसेच देशाच्या विकासासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची आवश्यकता आहे.'' असे गिरिराज सिंह यांनी सांगितले. दरम्यान, रामदेवबाबांनी केलेल्या वक्तव्याबाबत ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकांना असंवैधानिक गोष्टी बोलण्यापासून रोखण्यासाठी कुठलाही स्पष्ट कायदा नाही आहे. मात्र रामदेवबाबांच्या विचारांना अकारण महत्त्व दिले जाते., असे ओवेसी म्हणाले होते. हरिद्वार येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी देशाची लोकसंख्या दीडशे कोटींच्यावर जाऊ देता कामा नये. तिसऱ्या अपत्याला मताधिकार आणि सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवणारा कायदा झाला तरच हे शक्य होईल, असे सांगितले होते.  

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाPoliticsराजकारण