शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

कृत्रिम बुद्धिमत्तेत पदवी अभ्यासक्रमांची गरज; उद्योग, शिक्षण क्षेत्रांतील जाणकारांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 06:10 IST

अनेक उद्योग आणि रोजगारांत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी घटक ठरत आहे.

नवी दिल्ली : बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर देशात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम, तसेच व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांची गरज निर्माण झाली आहे, असे मत उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शालेय अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता एक ऐच्छिक विषय म्हणून समाविष्ट केला आहे. तथापि, पूर्ण पदवी अभ्यासक्रम अजून देशात कुठेच शिकविला जात नाही.पिअर्सन प्रोफेशनल प्रोग्राम्सचे (पीपीपी) उपाध्यक्ष वरुण धामिजा यांनी सांगितले की, डिजिटल युगाच्या विस्ताराबरोबर व्यावसायिक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. अनेक उद्योग आणि रोजगारांत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी घटक ठरत आहे. आगामी काळात प्रत्येक उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार असून, उद्योग व स्मार्टफोन क्रांतीत मोठा तंत्रज्ञानात्मक बदल त्यातून दिसून येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण अधिक केंद्रित आणि सहज उपलब्ध होईल, असे करणे ही काळाची गरज आहे.बिर्लासॉफ्टचे मुख्य लोकाधिकारी समित देब यांनी सांगितले की, विद्यापीठांत तसेच कुशल कर्मचाऱ्यांत कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित अभ्यासक्रमांची प्रचंड मागणी आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील धुरीणांनी त्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे.अबुधाबीत जगातील पहिलेकृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठसंयुक्त अरब आमिरातीने गेल्या महिन्यात अबुधाबी येथे जगातील पहिले ‘कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ’ स्थापन केले आहे. ‘मोहंमद बिन झायेद युनिव्हर्सिटी आॅफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एमबीझुआई), असे या विद्यापीठाचे नाव असून, तेथे पदवी अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठीही तेथे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. पुढील वर्षी २० सप्टेंबरपासून तेथे वर्ग सुरू होणार आहेत.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स