शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

पायाभूत सुविधांसाठी निधीची गरज; अर्थव्यवस्थेला मिळेल चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 04:08 IST

खासगी क्षेत्रात नफा दिसत नसल्याने गुंतवणुकीच्या प्रेरणा नाहीत.

प्रसाद जोशी नाशिक : यंदा अर्थसंकल्प मांडताना इराण-अमेरिका यांच्यातील युद्धजन्य वातावरण, तेलाच्या भडकणाऱ्या किमती, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध, देशांतर्गत अशांतता ही पार्श्वभूमी आहे. आर्थिक प्रगतीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांची कसोटी लागणार आहे.

पायाभूत सुविधा मजबूत असतील, तर अर्थव्यवस्थेला चालना मिळणे सोपे असते. देशात अद्यापही रस्ते, रेल्वे, विमानतळे, बंदरे, वीज अशा विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठा वाव आहे. या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी कसा उपलब्ध होणार, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. मागील अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेले अनेक पायाभूत सेवांचे प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यातीलकाही निधीअभावी रखडलेले आहेत. आर्थिक विकासाचा वेग कमी असल्याने करांपासून येणारे उत्पन्नही घटले आहे. सरकारने मागील अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेले निर्गुंतवणुकीचे उद्दिष्टही पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पायाभूत सेवांच्या विकासाला निधी मिळण्यासाठी काही वेगळे उपाय योजले पाहिजेत.

त्यासाठी देश-विदेशांतील गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. ते केल्यास सरकारला दीर्घकालीन भांडवल पुरवठा करणाºया संस्था दीर्घकालीन मुदतीच्या कर्जरोख्यांद्वारे काही रक्कम उभारू शकतील. देशांतर्गत व परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक येऊ आल्यास मिळणारे भांडवल पायाभूत सेवांसाठी वापरता येईल. त्यातून रोजगार उपलब्ध होईल, तो वाढल्यास मागणी वाढेल, गुंतवणूक वाढेल. यामुळे देशातील उत्पादन आणि उत्पन्न वाढू लागेल. खासगी क्षेत्रातली गुंतवणूक वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण दीर्घकालीन धोरण अपेक्षित आहे. त्यातून परकीय वित्तसंस्थ व उद्योगांचा सरकारवरचा विश्वास डळमळीत होणार नाही. अमेरिका-चीनदरम्यानच्या व्यापार युद्धामुळे भारतात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.अवघड, पण अशक्य नाहीखासगी क्षेत्रात नफा दिसत नसल्याने गुंतवणुकीच्या प्रेरणा नाहीत. पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक सार्वजनिक व खासगी क्षेत्राने एकत्रितपणे करणे अपेक्षित आहे. येत्या पाच वर्षांत रस्ते, घरबांधणी, रेल्वे, ऊर्जा, सिंचन आणि नागरी विकास या क्षेत्रात १०२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. हे अवघड आहे; पण अशक्य मात्र नाही. - प्रा. डॉ. शिशिर सिंदेकर, नाशिक.