शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भारत-नेट : लक्ष्य होते अडीच लाख गावांचे, प्रत्यक्षात झाले ९८ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 06:00 IST

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेंची माहिती

नवी दिल्ली : भारत नेट योजनेच्या माध्यमातून ऑगस्ट २०२१ पर्यंत अडीच लाख गावांना जोडण्याचे सरकारचे लक्ष्य होते; परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ९८ हजार ५६९ गावांपर्यंत पोहोचू शकलो असून, ही योजना पूर्ण करायला मुदत वाढवून घेणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राज्यसभेत दिली.१०० एमबीपीस वेगाची इंटरनेट सेवा २.५ लाख गावांना भारत नेट योजनेच्या माध्यमातून दिली जात आहे. यासाठी कालमर्यादा ऑगस्ट २०२१ ठेवण्यात आली आहे. पंरतु, योजना पूर्णत्वास येण्यास मुदतवाढ देण्याची आवश्यकता असल्याचे धोत्रे यांनी स्पष्ट केले. ही योजना पूर्ण करण्यासाठी आता खासगी क्षेत्रांची मदत घेतली जाणार आहे. नुकतीच संसदेच्या स्थायी समितीने या योजनेत होणाऱ्या विलंबासंबंधी कॅबिनेट नोट तयार करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाला दिले होते. खासगी क्षेत्राच्या मदतीने योजना पूर्ण करण्याची मंजुरी देण्यासाठी डिजिटल कम्युनिकेशन कमिशनने (डीसीसी) एका वर्षाहून अधिकचा काळ घेतला, असा ठपकादेखील समितीने ठेवला होता.काय आहे योजना?आतापर्यंत ४ लाख ९७ हजार ६७७ किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) पसरविण्यात आल्या आहेत. ओएफसी १ लाख ६५ हजार २२ गावांना जोडतात. १ लाख ५२ हजार ९२१ गावांमध्ये ओएफसीला जोडणारे उपकरणे लावण्यात आले आहेत. यूपीए सरकारने २०११ मध्ये ‘नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ नावाने ही योजना आणली होती. २०१५ मध्ये योजनेचे नाव ‘भारत नेट’ असे करण्यात आले होते.