शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
5
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
6
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
7
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
8
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
9
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
10
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
11
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
12
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
13
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
14
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
15
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
16
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
17
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
18
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
19
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
20
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

भारत-नेट : लक्ष्य होते अडीच लाख गावांचे, प्रत्यक्षात झाले ९८ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 06:00 IST

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेंची माहिती

नवी दिल्ली : भारत नेट योजनेच्या माध्यमातून ऑगस्ट २०२१ पर्यंत अडीच लाख गावांना जोडण्याचे सरकारचे लक्ष्य होते; परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ९८ हजार ५६९ गावांपर्यंत पोहोचू शकलो असून, ही योजना पूर्ण करायला मुदत वाढवून घेणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राज्यसभेत दिली.१०० एमबीपीस वेगाची इंटरनेट सेवा २.५ लाख गावांना भारत नेट योजनेच्या माध्यमातून दिली जात आहे. यासाठी कालमर्यादा ऑगस्ट २०२१ ठेवण्यात आली आहे. पंरतु, योजना पूर्णत्वास येण्यास मुदतवाढ देण्याची आवश्यकता असल्याचे धोत्रे यांनी स्पष्ट केले. ही योजना पूर्ण करण्यासाठी आता खासगी क्षेत्रांची मदत घेतली जाणार आहे. नुकतीच संसदेच्या स्थायी समितीने या योजनेत होणाऱ्या विलंबासंबंधी कॅबिनेट नोट तयार करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाला दिले होते. खासगी क्षेत्राच्या मदतीने योजना पूर्ण करण्याची मंजुरी देण्यासाठी डिजिटल कम्युनिकेशन कमिशनने (डीसीसी) एका वर्षाहून अधिकचा काळ घेतला, असा ठपकादेखील समितीने ठेवला होता.काय आहे योजना?आतापर्यंत ४ लाख ९७ हजार ६७७ किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) पसरविण्यात आल्या आहेत. ओएफसी १ लाख ६५ हजार २२ गावांना जोडतात. १ लाख ५२ हजार ९२१ गावांमध्ये ओएफसीला जोडणारे उपकरणे लावण्यात आले आहेत. यूपीए सरकारने २०११ मध्ये ‘नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ नावाने ही योजना आणली होती. २०१५ मध्ये योजनेचे नाव ‘भारत नेट’ असे करण्यात आले होते.