शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

"बिहारमध्येही एनडीएचा विजय होणार", दिल्लीतील भाजपच्या यशानंतर चिराग पासवान यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 17:46 IST

Chirag Paswan : चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाचा दावा केला असून एनडीए युती निवडणुकीत किती जागा जिंकेल, याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

Chirag Paswan : नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतही एनडीएतील घटक पक्षांना विजयाबद्दल पूर्ण विश्वास आहे. 

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएतील घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी एक मोठा दावा केला आहे. चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाचा दावा केला असून एनडीए युती निवडणुकीत किती जागा जिंकेल, याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

चिराग पासवान म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत एनडीएचा निकाल पाहून आम्ही नैतिकदृष्ट्या भारावून गेलो आहोत. आम्ही बिहारच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उत्साहाने सहभागी होणार आहोत. दिल्लीत एनडीएला मिळालेला विजय हाच आहे. २७ वर्षांनंतर दिल्लीत एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. दिल्ली, हरयाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांप्रमाणेच बिहारमध्येही असेच निकाल दिसतील.

पुढे चिराग पासवान यांनी सांगितले की, बिहारमध्ये आमची युती मजबूत आहे. भाजप, जेडीयू, एलजेपी (रामविलास), जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष, अशा ५ पक्षांमध्ये विजयी युती आहे. मी सतत बिहारला भेट देत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही २२५ हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करू. तसेच, इतर एनडीएतील पक्षांनाही तोच विश्वास आहे, असे चिराग पासवान म्हणाले.

बिहारमध्ये एनडीएचे सरकार येईल - गिरीराज सिंहदुसरीकडे, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही बिहारमध्ये एनडीए युती पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा दावा केला आहे. गिरीराज सिंह म्हणाले, बिहारमध्ये एनडीएचे सरकार आहे आणि फक्त एनडीएचे सरकारच स्थापन होईल. दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानBiharबिहारBJPभाजपा