शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

"एनडीएकडे बहुमत, आम्हा सर्वांचा सभापतींवर विश्वास", जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर किरेन रिजिजू संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 20:42 IST

Kiren Rijiju : किरेन रिजिजू यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पदावरुन हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर 60 सदस्यांच्या सह्या असून, त्यांनी राज्यसभेच्या महासचिवांकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. यावरून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर निशाणा साधत विरोधी 'इंडिया'आघाडीने केलेली कृती अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले आहे.

किरेन रिजिजू यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, सरकारला जगदीप धनखड यांचा खूप अभिमान आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे अतिशय निष्पक्ष असतात. राज्यसभा असो किंवा लोकसभा विरोधकांनी सभापतींच्या प्रतिष्ठेचा अनादर केला आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या आघाडीने सभापतींच्या सूचनांचे पालन न करून सातत्याने गैरवर्तन केले आहे, असे किरेन रिजिजू म्हणाले.

सभापती जगदीप धनखड हे सामान्य पार्श्वभूमीतून आले आहेत. ते नेहमी संसदेच्या आत आणि बाहेर शेतकरी आणि लोकांच्या हिताबद्दल बोलतात. ते आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही त्यांचा आदर करतो. जो प्रस्ताव देण्यात आला आहे आणि ज्या 60 खासदारांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. त्या 60 खासदारांच्या कृतीचा मी निषेध करतो. एनडीएकडे बहुमत आहे आणि आम्हा सर्वांचा सभापतींवर विश्वास आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सभागृहाचे मार्गदर्शन केले आहे, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत, असे किरेन रिजिजू यांनी सांगितले. 

दरम्यान, पहिल्यांदाच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पदावरुन हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर 60 सदस्यांच्या सह्या असून, त्यांनी राज्यसभेच्या महासचिवांकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. जर हा प्रस्ताव मांडला गेला तर तो मंजूर करण्यासाठी या पक्षांना साधारण बहुमताची आवश्यकता असेल, परंतु 243 सदस्यांच्या सभागृहात त्यांच्याकडे आवश्यक संख्या नाही.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदBJPभाजपा