शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, लवकरच देणार 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 13:51 IST

पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकार खडबडून जागं झालं आहे.

ठळक मुद्देमोदी सरकार शेतकऱ्यांना नवनव्या योजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. एनडीए सरकार संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक जबरदस्त पॅकेज देण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्याला 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली-  पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकार खडबडून जागं झालं आहे. तीन राज्यांत भाजपाला शेतकऱ्यांची नाराजी भोवल्यानंच सत्ता गमवावी लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार शेतकऱ्यांना नवनव्या योजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक जबरदस्त पॅकेज देण्याच्या तयारीत आहे. त्यावर सध्या कामही सुरू आहे.विशेष म्हणजे या योजनेंतर्गत शेतकऱ्याला 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. येत्या शेवटच्या बजेटमध्ये याची घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शेतकऱ्याला 1 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यावर सरकार विचार करत होते. परंतु आता शेतकऱ्याला थेट 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृषी मंत्रालय यासंदर्भात नीती आयोगाशी चर्चा करणार आहे. त्यानंतर या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात येऊ शकते. मोदी सरकारच्या या योजनेचा छोटछोट्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी मुदतीत कर्ज फेडलं आहे. त्यांना सध्या सरकार कर्ज वाटप करत आहे. कर्जमाफीनंतर बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास कचरतायत. परंतु सरकारनं मध्यस्थी केल्यानं बँका शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देऊ शकतात. या वर्षाच्या शेवटच्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे.सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं यासंदर्भात बँक अधिकाऱ्यांशी बातचीतही केली आहे. जोपर्यंत सरकार क्रेडिट गॅरंटी यंत्रणा लागू करत नाही, तोपर्यंत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत. बँकर्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राज्यांद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीच्या विरोधात आहेत. तसेच केंद्र सरकारनं या योजनेसंदर्भात सर्व मंत्रालयांकडून अभिप्राय मागवला आहे. त्यानुसारच फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा होऊ शकते. सीबीआयच्या रिपोर्टनुसार, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानं ही समस्या सुटणार नाही. तसेच शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढले यावर भर दिला पाहिजे. 

टॅग्स :Farmerशेतकरी