शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

कृषी विधेयकावरून रालोआने फसविले; अकालीची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:24 IST

अध्यक्ष सुखबीरसिंग बादल । युती तोडणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा विधेयकामुळे शिरोमणी अकाली दलाच्या मनात राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ) फसविले गेल्याची भावना आहे, असे पक्षाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत बादल यांनी सांगितले की, या विधेयकामुळे देशाचे संघीय संरचना आणि पंजाबची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल.

बादल यांनी सांगितले की, कृषी विधेयकामुळे मी दु:खी झालो आहे. काँग्रेसच्या शेतकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी रालोआची स्थापना करण्यात आली होती. माझे वडील सरदार प्रकाशसिंग बादल हे त्याचे संस्थापक सदस्य होते. काँग्रेसच्या धोरणांना विरोध केल्यामुळे माझ्या वडिलांना तिहारच्या तुरुंगात डांबण्यात आले होते. तेथूनच याची खरी सुरुवात झाली होती. हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, याचा अर्थ अकाली दल-भाजपची युती संपली असा होतो का, या प्रश्नावर बादल यांनी सांगितले की, आमच्या पक्षाची गाभा समिती परिस्थितीचे आकलन करून यावर योग्य तो निर्णय घेईल. दुर्दैवाने, कृषी अध्यादेश आणताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. आमच्या पक्षात रालोआकडून फसविले गेल्याची भावना आहे.

राजीनामा स्वीकारण्याची जी घाई सरकारने केली, त्याचे तुम्हाला आश्चर्य वाटले नाही का, या प्रश्नावर बादल यांनी सांगितले की, नाही. तडजोडीला कोणताही मार्गच उरला नव्हता. आमचा पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. आमच्या पक्षाचे ९० टक्के सदस्य शेतकरी आहेत. असे असतानाही कृषी अध्यादेश काढताना आमचा साधा सल्लाही घेतला गेला नाही. बादल म्हणाले, अध्यादेशाशी संबंधित आंतर-मंत्रालयीन टिपणाला हरसिमरत यांनी आक्षेप घेतला होता. मुळात हा विषयच मंत्रिमंडळ बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर नव्हता. शेवटच्या क्षणी तो मांडण्यात आला.दिवाळखोरी विधेयक राज्यसभेत मंजूरनवी दिल्ली : नादारी व दिवाळखोरी संहिता (द्वितीय सुधारणा) विधेयक-२0२0 ला शनिवारी राज्यसभेने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. औद्योगिक कर्जदार आणि त्यांचे वैयक्तिक हमीदार या दोघांवर एकत्रच दिवाळखोरी खटला चालविण्याची तरतूद नव्या कायद्यात असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केले.काही सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना सीतारामन यांनी सांगितले की, औद्योगिक कर्जदारांना नेहमीच हमीदार असतात. त्यामुळे आम्ही दोघांवर खटला चालविण्याची व्यवस्था असावी, असा विचार केला.नादारी व दिवाळखोरी संहितेत (आयबीसी) सुधारणा करणारा एक अध्यादेश सरकारने जूनमध्ये जारी केला होता. त्याची जागा हे विधेयक घेणार आहे.सीतारामन यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च रोजी देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यानंतरच्या सहा महिन्यांतील कर्ज थकबाकी ही नादारी प्रक्रिया सुरू करण्यासाठी गृहीत धरली जाणार नाही. २५ मार्चपूर्वीची दिवाळखोरी प्रक्रिया मात्र सुरू राहील. सुधारणा विधेयकामुळे त्यात बाधा येणार नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबFarmerशेतकरी