शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कृषी विधेयकावरून रालोआने फसविले; अकालीची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:24 IST

अध्यक्ष सुखबीरसिंग बादल । युती तोडणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा विधेयकामुळे शिरोमणी अकाली दलाच्या मनात राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ) फसविले गेल्याची भावना आहे, असे पक्षाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत बादल यांनी सांगितले की, या विधेयकामुळे देशाचे संघीय संरचना आणि पंजाबची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल.

बादल यांनी सांगितले की, कृषी विधेयकामुळे मी दु:खी झालो आहे. काँग्रेसच्या शेतकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी रालोआची स्थापना करण्यात आली होती. माझे वडील सरदार प्रकाशसिंग बादल हे त्याचे संस्थापक सदस्य होते. काँग्रेसच्या धोरणांना विरोध केल्यामुळे माझ्या वडिलांना तिहारच्या तुरुंगात डांबण्यात आले होते. तेथूनच याची खरी सुरुवात झाली होती. हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, याचा अर्थ अकाली दल-भाजपची युती संपली असा होतो का, या प्रश्नावर बादल यांनी सांगितले की, आमच्या पक्षाची गाभा समिती परिस्थितीचे आकलन करून यावर योग्य तो निर्णय घेईल. दुर्दैवाने, कृषी अध्यादेश आणताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. आमच्या पक्षात रालोआकडून फसविले गेल्याची भावना आहे.

राजीनामा स्वीकारण्याची जी घाई सरकारने केली, त्याचे तुम्हाला आश्चर्य वाटले नाही का, या प्रश्नावर बादल यांनी सांगितले की, नाही. तडजोडीला कोणताही मार्गच उरला नव्हता. आमचा पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. आमच्या पक्षाचे ९० टक्के सदस्य शेतकरी आहेत. असे असतानाही कृषी अध्यादेश काढताना आमचा साधा सल्लाही घेतला गेला नाही. बादल म्हणाले, अध्यादेशाशी संबंधित आंतर-मंत्रालयीन टिपणाला हरसिमरत यांनी आक्षेप घेतला होता. मुळात हा विषयच मंत्रिमंडळ बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर नव्हता. शेवटच्या क्षणी तो मांडण्यात आला.दिवाळखोरी विधेयक राज्यसभेत मंजूरनवी दिल्ली : नादारी व दिवाळखोरी संहिता (द्वितीय सुधारणा) विधेयक-२0२0 ला शनिवारी राज्यसभेने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. औद्योगिक कर्जदार आणि त्यांचे वैयक्तिक हमीदार या दोघांवर एकत्रच दिवाळखोरी खटला चालविण्याची तरतूद नव्या कायद्यात असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केले.काही सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना सीतारामन यांनी सांगितले की, औद्योगिक कर्जदारांना नेहमीच हमीदार असतात. त्यामुळे आम्ही दोघांवर खटला चालविण्याची व्यवस्था असावी, असा विचार केला.नादारी व दिवाळखोरी संहितेत (आयबीसी) सुधारणा करणारा एक अध्यादेश सरकारने जूनमध्ये जारी केला होता. त्याची जागा हे विधेयक घेणार आहे.सीतारामन यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च रोजी देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यानंतरच्या सहा महिन्यांतील कर्ज थकबाकी ही नादारी प्रक्रिया सुरू करण्यासाठी गृहीत धरली जाणार नाही. २५ मार्चपूर्वीची दिवाळखोरी प्रक्रिया मात्र सुरू राहील. सुधारणा विधेयकामुळे त्यात बाधा येणार नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबFarmerशेतकरी