शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा आणि काँग्रेस दोघांना खूश ठेवण्याचा केला प्रयत्न ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 13:48 IST

गुजरात राज्यसभा निवडणुकीत भाजपाने आपली संपूर्ण ताकत पणाला लावूनही काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल विजयी झाले.

ठळक मुद्देकंधाल जाडेजा यांनी भाजपाच्या बाजूने तर, जयंत पटेल यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले.  जयंत पटेल आनंद जिल्ह्यातील उमरेठ मतदारसंघाचे आमदार आहेत.

सूरत, दि. 10 - गुजरात राज्यसभा निवडणुकीत भाजपाने आपली संपूर्ण ताकत पणाला लावूनही काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल विजयी झाले. या राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक एक मत महत्वाचे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपा आणि काँग्रेस दोघांच्या बाजूने मतदान केले. कंधाल जाडेजा यांनी भाजपाच्या बाजूने तर, जयंत पटेल यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस आणि भाजपा दोघांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे. कंधाल जाडेजा हे पोरबंदर जिल्ह्यातील कुतियाना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात तर, जयंत पटेल आनंद जिल्ह्यातील उमरेठ मतदारसंघाचे आमदार आहेत. जाडेजा यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.  भाजपाने त्यांना नोव्हेंबर अखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकीत फक्त तिकीट देण्याचेच नव्हे तर,  भाजपाच्या नियंत्रणाखाली असलेल्या डेअरी उद्योगात महत्वाची भूमिका देण्याचा त्यांना शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे. 

उमरेठचे आमदार जयंत पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने 2012 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या मदतीची परतफेड केली. जयंत पटेल यांचा मतदारसंघ आनंद जिल्ह्यात येतो हा जिल्हा काँग्रेसचे प्रमुख नेते भरतसिंह सोलंकी यांचा बालेकिल्ला आहे. जयंत पटेल आधी सारसामधून आमदार होते. मतदारसंघ फेररचनेत त्यांचा मतदारसंघ गायब झाल्यानंतर ते सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना उमरेठचा सुरक्षित मतदारसंघ देण्यात आला. पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे त्यामुळे त्यांनी अहमद पटेल यांना मतदान केले. 

सत्यमेव जयते! विजयानंतर अहमद पटेल यांची प्रतिक्रियाअत्यंत आव्हानात्मक ठरलेल्या निवडणुकीत भाजपाध्यक्ष अमित शहांची रणनीती आणि भाजपाचे सर्व प्रयत्न हाणून पाडत विजय मिळवल्यानंतर अहमद पटेल यांनी सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे. काल राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य रंगले होते. मात्र अनेक वळणे घेतल्यानंतर आज मध्य रात्री पावणे दोन वाजता निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात अहमद पटेल यांनी 44 मते मिळवत अर्ध्या मताने विजय मिळवला.

या विजयानंतर अहमद पटेल यांनी ट्विटरवरून सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली. "ही निवडणूक माझ्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात अवघड निवडणूक होती. बऱ्याच निवडणुका लढवल्या मात्र एवढे आव्हान कधी मिळाले नव्हते. भाजपाकडून मला पराभूत करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने मला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. त्यांचा यामागे काय हेतू होता हे माहीत नाही." असे अहमद पटेल म्हणाले.