शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा का होईना, शहाणपण आलं! तीन कृषी रद्द होताच शरद पवारांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 13:58 IST

तीन कृषी कायदे रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय; विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा समाचार

चंद्रपूर: कृषी कायदे करताना राज्य सरकारांना विश्वासात घेण्यात आलं नाही. संसदेत गोंधळात तिन्ही कायदे मंजूर करण्यात आले. त्या कायद्यांना शेतकऱ्यांना तीव्र विरोध केला. अखेर सरकारला उशिरा का होईना, शहाणपण आलं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

मोदी सरकारनं आणलेले तीन कायदे कृषी अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणारे होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला. त्यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरयाणातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात फटका बसून नये म्हणून कायदे रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला, असं पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

हजारो शेतकरी गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. थंडी, वारा, ऊन, पावसाची तमा न बाळगता शांततेच्या मार्गानं त्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अखेर सरकारला घ्यावी लागली. या शेतकऱ्यांच्या लढ्याला, त्यांच्या संघर्षाला मी सलाम करतो, असं म्हणत पवारांनी शेतकरी आंदोलकांचं कौतुक केलं.

शेती हा प्रामुख्यानं राज्य सरकारच्या अंतर्गत येणारा विषय आहे. त्यामुळे कृषी कायदे करण्यापूर्वी केंद्रानं राज्य सरकारांशी चर्चा करायला हवी होती. मात्र तशी कोणतीच चर्चा झाली नाही. संसदेत गोंधळ सुरू असताना विधेयकं मंजूर करून घेण्यात आली. पण आता पंजाब, उत्तर प्रदेशातील निवडणुका जवळ आल्या आहेत. तिथल्या लोकांचा रोष स्थानिक भाजप नेत्यांनी पाहिला. त्यामुळेच कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय झाला, असं शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी