शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

NCB Recruitment: तयार रहा! एनसीबीमध्ये लवकरच मोठी भरती निघणार; 1800 जागांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 07:14 IST

नशामुक्त भारत’ मोहिमेसाठी केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली असून, याच अनुषंगाने एनसीबीमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या तीन वर्षांत देशात अमली पदार्थांच्या व्यवहारांत लक्षणीय वाढ झाली असून, या वाढत्या व्यवहारांना चाप लावण्यासाठी एनसीबीमध्ये (नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो) लवकरच १८०० नव्या अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. सध्या देशात एनसीबीचे अवघे ११०० अधिकारी असून, या भरतीमुळे अमली पदार्थ विरोधी कारवायांसाठी एनसीबीला मोठे बळ मिळणार आहे.  

एनसीबीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नशामुक्त भारत’ मोहिमेसाठी केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली असून, याच अनुषंगाने एनसीबीमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तीन हजार नव्या अधिकाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव एनसीबीने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला; मात्र यापैकी १८०० अधिकाऱ्यांच्या भरतीला गृहमंत्रालयाने हिरवा कंदील दिला असून, आता केंद्रित वित्तमंत्रालयाच्या शिक्कामोर्तबाची औपचारिकता बाकी आहे. या भरतीमध्ये उपसंचालक आणि सहायक संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही भरती होणार आहे. 

देशातील अंमली पदार्थ व्यवहारांचा पॅटर्नही मोठ्या प्रमाणात बदलत असून, आजवर प्रामुख्याने अमली पदार्थांची तस्करी ही समुद्रकिनारी वसलेल्या शहरांतून होत असायची; मात्र आता अमली पदार्थांच्या व्यवहाराने अजमेर, अमृतसर, भुवनेश्वर, देहरादून, गोवा, हैदराबाद, मदुराई, मंडी, रायपूर, रांची, कोची अशा प्रथम व द्वितीय श्रेणी शहरांतूनही आपले हातपाय मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. याला पायबंद घालण्यासाठी प्रामुख्याने या अधिकाऱ्यांच्या नेमणुका होणार असल्याचे समजते.

तीन वर्षांत १८८१ कोटींचे अमली पदार्थ      २०१८ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत देशभरात सुमारे १८८१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.      या छाप्यांत ३५ लाख किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो