शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हरियाणाचे मुख्यमंत्री प्यायले यमुनेचे पाणी; केजरीवालांनी केलेला नदीत विष मिसळल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:22 IST

Nayab Singh Saini News: हरियाणातील भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप अरविंद केजरीवालांनी केला आहे.

Nayab Singh Saini Yamuna River : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात यमुनेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. अलीकडेच आप प्रमुख अरविंद केजरीवालांनी हरियाणा सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजप आणि आप नेत्यांमध्ये जोरदार टीका-टिप्पण्या सुरू आहेत. आता याच पार्श्वभूमीवर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी त्यांच्या पल्ला गावात पोहोचले आणि यमुनेचे पाणी प्यायले. हा व्हिडिओही समोर आला आहे.

अरविंद केजरीवालांच्या आरोपानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सीएम सैनींना सोबत पल्ला घाटावर जाऊन यमुनेच्या पाण्याची चाचणी करण्याचे आव्हान दिले होते. यानंतर, हरियाणाचे मुख्यमंत्री एकटेच दिल्लीतील पल्ला गावात पोहोचले यमुना नदीचे पाणी प्यायले. याशिवाय, त्यांनी आतिशी यांच्या एक्स पोस्टला उत्तर देताना आप सरकारवर जोरदार टीकाही केली. आपच्या डमी (खड़ाऊं) मुख्यमंत्री आतिशी मार्लेनाजी, पल्ला गावातील यमुनेच्या किनाऱ्यावर तुमचे स्वागत आहे. हरियाणातून दिल्लीला येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात तर विष नाही, पण तुमच्या डोक्यात नक्कीच विष भरलंय. तुमचे अपयश झाकण्यासाठी हरियाणा सरकारवर आरोप करता, अशी टीका सैनी यांनी केली.

अरविंद केजरीवालांचे वक्तव्य दुर्दैवीसीएम सैनी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, अरविंद केजरीवालांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी ज्या प्रकारचे भितीदायक वक्तव्ये केले आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. आज मी पवित्र यमुना मातेच्या चरणी आलो आहे. भाजप सरकारने विष मिसळले, असे ते म्हणाले होते. मी आज हे यमुनेचे पामी प्यायलो, पाणी पूर्णपणे स्वच्छ आहे. हे पाणी दिल्लीत गेल्यावर दुषित होते. याचे कारण म्हणजे, केजरीवालांनी 10 वर्षांत एकही ट्रीटमेंट प्लांट लावला नाही. मी यमुना स्वच्छ करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, पण त्यांनी काहीच केले नाही.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकHaryanaहरयाणाBJPभाजपा