शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

हरियाणाचे मुख्यमंत्री प्यायले यमुनेचे पाणी; केजरीवालांनी केलेला नदीत विष मिसळल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:22 IST

Nayab Singh Saini News: हरियाणातील भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप अरविंद केजरीवालांनी केला आहे.

Nayab Singh Saini Yamuna River : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात यमुनेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. अलीकडेच आप प्रमुख अरविंद केजरीवालांनी हरियाणा सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजप आणि आप नेत्यांमध्ये जोरदार टीका-टिप्पण्या सुरू आहेत. आता याच पार्श्वभूमीवर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी त्यांच्या पल्ला गावात पोहोचले आणि यमुनेचे पाणी प्यायले. हा व्हिडिओही समोर आला आहे.

अरविंद केजरीवालांच्या आरोपानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सीएम सैनींना सोबत पल्ला घाटावर जाऊन यमुनेच्या पाण्याची चाचणी करण्याचे आव्हान दिले होते. यानंतर, हरियाणाचे मुख्यमंत्री एकटेच दिल्लीतील पल्ला गावात पोहोचले यमुना नदीचे पाणी प्यायले. याशिवाय, त्यांनी आतिशी यांच्या एक्स पोस्टला उत्तर देताना आप सरकारवर जोरदार टीकाही केली. आपच्या डमी (खड़ाऊं) मुख्यमंत्री आतिशी मार्लेनाजी, पल्ला गावातील यमुनेच्या किनाऱ्यावर तुमचे स्वागत आहे. हरियाणातून दिल्लीला येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात तर विष नाही, पण तुमच्या डोक्यात नक्कीच विष भरलंय. तुमचे अपयश झाकण्यासाठी हरियाणा सरकारवर आरोप करता, अशी टीका सैनी यांनी केली.

अरविंद केजरीवालांचे वक्तव्य दुर्दैवीसीएम सैनी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, अरविंद केजरीवालांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी ज्या प्रकारचे भितीदायक वक्तव्ये केले आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. आज मी पवित्र यमुना मातेच्या चरणी आलो आहे. भाजप सरकारने विष मिसळले, असे ते म्हणाले होते. मी आज हे यमुनेचे पामी प्यायलो, पाणी पूर्णपणे स्वच्छ आहे. हे पाणी दिल्लीत गेल्यावर दुषित होते. याचे कारण म्हणजे, केजरीवालांनी 10 वर्षांत एकही ट्रीटमेंट प्लांट लावला नाही. मी यमुना स्वच्छ करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, पण त्यांनी काहीच केले नाही.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकHaryanaहरयाणाBJPभाजपा