शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर नक्षलवादी हल्ला, दोन आयटीबीपी जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:12 IST

नक्षलवाद्यांनी जवानांकडून एके -47 रायफल देखील लुटली आहे.

रायपूर: छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आयटीबीपीचे दोन जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी कडेमेटा कॅम्पपासून 600 मीटर अंतरावर सैनिकांवर हल्ला केला. यानंतर जवानांकडून एके -47 रायफल, दोन बुलेटप्रूफ जॅकेट आणि वॉकी टॉकी लुटून नक्षलवादी पळून गेले.

चार दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी नक्षल प्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांना अटक केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. सुरक्षा दलांनी दंतेवाडाच्या कुआकोंडा पोलीस स्टेशन परिसरातून तीन नक्षलवादी हंगा कर्टम (25), आयता माडवी (25) आणि पोज्जा उर्फ ​​लाठी कर्तम (28) यांना अटक केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी पोलिसांचे पथक कुआकोंडा पोलीस ठाण्यातून बडेगुद्रा आणि अतेपाल गावाच्या दिशेने पाठवण्यात आले होते. जेव्हा टीम अतेपाल गावाजवळ जंगलात होती, तेव्हा तीन संशयित पळून जाऊ लागले. पोलिसांच्या पथकाने घेराव घातला आणि त्यांना पकडले. जेव्हा पोलीस पथकाने त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांची नावे हंगा कर्तम, आयता माडवी आणि पोज्जा उर्फ ​​लाठी कर्तम असल्याचे सांगितले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड