शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर नक्षलवादी हल्ला, दोन आयटीबीपी जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:12 IST

नक्षलवाद्यांनी जवानांकडून एके -47 रायफल देखील लुटली आहे.

रायपूर: छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आयटीबीपीचे दोन जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी कडेमेटा कॅम्पपासून 600 मीटर अंतरावर सैनिकांवर हल्ला केला. यानंतर जवानांकडून एके -47 रायफल, दोन बुलेटप्रूफ जॅकेट आणि वॉकी टॉकी लुटून नक्षलवादी पळून गेले.

चार दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी नक्षल प्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांना अटक केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. सुरक्षा दलांनी दंतेवाडाच्या कुआकोंडा पोलीस स्टेशन परिसरातून तीन नक्षलवादी हंगा कर्टम (25), आयता माडवी (25) आणि पोज्जा उर्फ ​​लाठी कर्तम (28) यांना अटक केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी पोलिसांचे पथक कुआकोंडा पोलीस ठाण्यातून बडेगुद्रा आणि अतेपाल गावाच्या दिशेने पाठवण्यात आले होते. जेव्हा टीम अतेपाल गावाजवळ जंगलात होती, तेव्हा तीन संशयित पळून जाऊ लागले. पोलिसांच्या पथकाने घेराव घातला आणि त्यांना पकडले. जेव्हा पोलीस पथकाने त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांची नावे हंगा कर्तम, आयता माडवी आणि पोज्जा उर्फ ​​लाठी कर्तम असल्याचे सांगितले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड